या जीवनचरित्राद्वारे मी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग मांडत आहे. यामध्ये त्यांची कार्ये, लढाया, स्वराज्याविषयक धोरणे आणि त्यांचा धर्मविषयक विचार या प्रेरक लेखाद्वारे आपल्यासमोर मांडत आहोत.
संभाजी महाराजांचा इतिहास नक्कीच लहान मुलांपासून आजच्या नवपिढीला प्रेरणा देणारा आहे. या जीवनचरित्राद्वारे आपल्याला एक आदर्श पुत्र, पिता आणि मित्र, यांबरोबर एक न्यायप्रिय आणि चारित्र्यवान राजाचे दर्शन घडेल.
संभाजी महाराजांविषयी संक्षिप्त माहिती
घटक | माहिती |
---|---|
ओळख | मराठा साम्राज्याचे दुसरे महान छत्रपती |
जन्म | १४ मई १६५७ पुण्यातील पुरंदर किल्ल्यावर |
राज्याभिषेक | २० जुलाई १६८० रोजी पन्हाळा किल्ल्यावर |
शासनकाळ | २० जुलै, १६८० ते ११ मार्च, १६८९ |
पालक | माता: सईबाई, पिताः छत्रपती श्री शिवाजी महाराज, |
पत्नी | येसूबाई |
मुले | मोठी मुलगी: भवानीबाई, लहान मुलगाः शाहूजी भोसले |
मृत्यू | ११ मार्च, १६८९ |
संभाजी महाराजांचे बालपण
अवघ्या अडीच वर्षांच्या वयात संभाजीराजांच्या आई सईबाई मरण पावल्या. त्यांच्या आईच्या मृत्यूचे कारण पुराव्याअभावी अजून स्पष्ट नाही.
त्या वेळी जिजाबाई (त्यांच्या आजी) तेथे होत्या आणि त्यांनी संभाजीराजांचे चारित्र्य निर्माण करण्याची जबाबदारी घेतली.
अर्थात, दुसरे शिवाजी महाराज घडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. संभाजीराजांना संस्कृत भाषा शिकवण्यासाठी जिजाऊंनी पंडित (शिक्षक) यांना नियुक्त केले.

संभाजीराजे यांना जिजाऊंची शिकवण
अर्थातच, शिवरायांचे पुत्र असल्याने संभाजी महाराजांमध्ये प्रबळ नेतृत्व क्षमता, चौकस बुद्धी, प्रजेबद्दल दयाभाव, फितुरी आणि अन्यायाविषयी चीड, महिलांचा आदर यांसारखे गुण होते. जिजाऊंनी त्यांना न्यायनिवाडा कसा करावा,राज्यामधील समस्या आणि निवारण, किल्ले गडकोट यांची पुरेपूर माहिती यांमध्ये मदत केली.
संभाजी महाराजांनी आपल्या गुरूंच्या सानिध्यात युद्ध कौशल्ये, युद्धनीती, राजनीती, संस्कृत, विज्ञान, अर्थशास्त्र, इत्यादी शिकले होते. ते संस्कृतमध्ये पारंगत होते त्यामुळे त्यांना “महापंडित” म्हणून ओळखले जात आणि त्याबरोबरच लोकांना न्याय देण्यासाठी ते प्रसिद्ध होते.
अगदी लहान ९ वर्षांच्या वयात मुगल कोर्टात त्यांना राजनीतीचा भाग म्हणून मनसबदारी स्वीकारावी लागली.
संभाजीमहाराजांचे व्यक्तित्व
संभाजी महाराज शरीराने मजबूत बांध्याचे, उंच . त्यांचा शारीरिक तपशील खालील प्रमाणे आहेत:
संभाजी महाराज शारीरिक माहिती: उंची आणि वजन
मी छत्रपती संभाजीराजांची उंची अंदाजे ६’२” इतकी होती आणि वजन अंदाजी ११० किलोग्रॅम होते.
संभाजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ
संभाजी महाराज १४ वर्षाच्या वयामध्ये १४ विविध भाषेमध्ये पारंगत झाले होते. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, उर्दू, पोर्तुगीज, संस्कृत, मुघल भाषा, सर्व दक्षिण भारतीय भाषा, सर्व डेक्कन भाषा, इत्यादी भाषा होत्या. त्यांनी याच वयात बुधभूषण, नखशिखांत किंवा नायिका भेद, सात शासक असे तीन ग्रंथ लिहिले होते.
पुरंदरचा तह: संभाजी महाराजांचा संबंध

पुरंदरचा तह शिवाजी महाराजांनी केला परंतु संभाजी महाराजांचा इतिहास देखील त्याच्याशी संबंधित होता. शिवरायांना पुत्र संभाजी यांना बरोबर घेऊन मुघल दरबारात जावे लागेल असे वचन मिर्झा जयसिंगाने शिवाजी महाराजांकडून या तहाच्या वेळी घेतले होते.
शिवाजी महाराज संसदेत मिर्झा जयसिंह यांना वचन दिल्याप्रमाणे दिल्लीत आले होते. त्यामुळे, अगदी बालवयात संभाजीराजे राजकारणाचे शिकार झाले. पण त्यामुळे त्यांना राजकीय डावपेच आणि त्यांचा तोड शिकण्यास साहजिकच मदत झाली असणार.
संभाजी महाराजांचा विवाह
शिवाजी महाराजांनी स्वराज्याला राजकीय फायदा व्हावा यादृष्टीने स्वइच्छेविरुद्ध आठ विवाह केले होते. संभाजीराजांचादेखील विवाह राजकीय गटबंधन व्हावे याउद्देशाने केला होता. त्यावेळी लग्न हे अत्यंत लहान वयात व्हायचे. शंभूराजांचेदेखील लग्नदेखील लहान वयात झाले.
पिलगिरराव शिर्के यांना स्वराज्यात सामील केल्यास मराठ्यांना कोकण भागात जम बसण्यात मदत होईल. यादृष्टीने, शिवरायांनी पिलगिरराव शिर्के यांची कन्या जिऊबाई हिच्याशी संभाजीराजांचा विवाह लावला होता. विवाहानंतर नंतर मराठा परंपरेनुसार जिऊबाईंचे नाव “येसूबाई” असे बदलण्यात आले.
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा इतिहास
शिवरायांच्या मृत्यूवेळी संभाजीराजे पन्हाळा किल्ल्याच्या किल्लेदाराकडे नजरबंद होते. काही लोकांचा असा समज आहे की, शिवाजी महाराजांच्या दरबारातील काही प्रभावशाली मंत्र्यांच्या मदतीने संभाजीराजांना छत्रपती बनण्यापासून रोखण्याचा कट सोयराबाईंनी रचला.
काही लोक तर शिवरायांना विष देण्यातही सोयराबाईंचे नाव घेतात. परंतु, सोयराबाईंविरुद्ध अद्याप असा कोणताही पुरावा मिळालेला नाही. उलट, सोयराबाईंना संभाजी महाराजांनी रायगडावर सन्मानित केले होते.
शिवरायांच्या मृत्यूवेळी रायगडावर उपस्तित मंत्री:
- शिवाजी महाराजांचे सुरनीस अण्णाजी दत्तो,
- नीलकंठ मोरे शिरप्रधान,
- प्रल्हाद पंत,
- गंगाधर जनार्दन,
- रामचंद्र नीलकंठ,
- आबाजी महादेव,
- जोशीराव,
- बाळप्रभू हे अष्टप्रधान मंडळातील मंत्री तसेच
- हैबतराव निंबाळकर,
- संताजी घोरपडे,
- समशेर बहाद्दर,
- बहिर्जी घोरपडे,
- विश्वासराव,
- मुधोजीराव,
- शिधोजिराव निंबाळकर,
- गणोजीराजे,
- शिर्केमालेकर,
- हीरोजी फर्जंद,
- बाबाजी घाटगे,
- संभाजी कावजी,
- बाबाजी कदम,
- महादजी नाईक
- पाणसंबळ,
- सूर्याजी मालुसरे,
- कृष्णाजी नाईक,
- महादजी नाईक,
- बहिर्जी नाईक,
- निळोजी पंत (प्रधान पुत्र),
- प्रल्हाद पंत,
- गंगाधरपंत (जनार्दनपंतांचे पुत्र ),
- रामचंद्र नीलकंठ,
- रावजी सोमनाथ,
- आबाजी महादेव,
- जोतीराव,
- बाळप्रभू चिटणीस (बालाजी आवजी ) हे होते.
संभाजीराजे यांनी न्यायनिवाडा करताना आरोपपत्रामध्ये ३५ मंत्र्यांचीच नावे होती. वरील मंत्र्यांपैकीच २२ मंत्रांना शिक्षा झाली.
या २२ मंत्रांमध्ये बाळप्रभू चिटणीस (उर्फ बालाजी आवजी) हेदेखील होते. पण नंतर म्हणजे त्यांना शिक्षा झाल्यावर ते पूर्णतः निर्दोष असल्याचे समजते. त्यामुळे संभाजी महाराज त्यांच्या स्मरणार्थ त्यांची समाधी रायगडावर उभारतात.
षडयंत्राबद्दलची माहिती मिळाल्यावर संभाजीराजांना पन्हाळ्यातून निसटणे गरजेचे होते, त्यामुळे त्यांना किल्लेदाराशी युद्ध करावे लागले, यामध्ये किल्लेदार मारला जातो.
संभाजी महाराजांची स्वराज्यविरोधी फितुरांना केलेली कठोर शिक्षा

पन्हाळ्यानंतर संभाजीराजांना रायगड किल्ला पुन्हा ताब्यात घेणे गरजेचे होते. हंबीराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे सेनापती आणि सोयराबाईंचे मोठे भाऊ होते. हंबीरराव मोहिते यांनी संभाजी महाराजांना रायगड पुन्हा अधिपत्याखाली आणण्यास मदत केली.
त्यानंतर संभाराजे यांनी अण्णाजी दत्तो, पेशवा मोरोपंत पिंगळे आणि शिरके यांसारख्या राजद्रोही मंत्र्यांना तुरुंगात टाकले, काहींना हत्तीच्या पायाखाली दिले, तर काहींचा कडेलोट केला. शंभूराजांची “न्यायप्रिय शासक” अशी ख्याती होती. संभाजीराजांनी अन्याय आणि फितुरी कधीच सहन केली नाही.
संभाजी महाराजांचा राज्याभिषेक
जेव्हा संभाजीराजे छत्रपती झाले तेव्हा मराठा आणि मुगल यांच्यात अनेक संघर्ष लढाया झाल्या. संभाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या जीवनातील संघर्षाची माहिती देतो.
शिवरायांच्या मृत्यूनंतर तीन महिन्याने संभाजीराजांचा पन्हाळगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडला. युवराज संभाजीराजे आता छत्रपती झाले होते. छत्रपती शंभूराजांनी प्रजेचे हाल पहिले आणि त्यांनी राज्यातील गरिबी, अन्नधान्याची कमी भरून काढण्यासाठी १६८० मध्ये औरंगझेबची खानदेश सुभ्याची राजधानी बुऱ्हाणपुरवर हल्ला केला. या हल्ल्यात खूप मोठा मुघल खजिना मराठ्यांना मिळाला.
संभाजी महाराजांचे बुऱ्हाणपुरवर आक्रमण
मी संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये बुऱ्हाणपूरचा हल्ला खूप प्रसिद्ध होता, कारण हा संभाजी महाराजांचा छत्रपती झाल्यानंतरच पहिली लढाई होती. या लढाईमध्ये मुगल सैन्याला पराभूत करून २०,००० मराठा सैन्याने औरंगझेबाच्या खानदेशातील राजधानीला लुटले.
अकबर-द्वितीय हा औरंगजेबचा चौथा मुलगा याने मुगल साम्राज्याविरूद्ध विद्रोह केला आणि पुढच्या विद्रोहाचे नियोजन करण्यासाठी औरंगाबादला गेला.
अकबरला पकडण्यासाठी औरंगजेबही औरंगाबादला गेला. तेथे औरंगझेबने अकबरला हरवल्याने, अकबराला तेथून पलायन करावे लागते. अकबर-द्वितीय पराभूत झाल्यानंतर तो रायगडावर संभाजी महाराजांचा आश्रय घेतो.
छत्रपती शंभूराजांनी प्रजेचे हाल पहिले आणि त्यांनी राज्यातील गरिबी, अन्नधान्याची कमी भरून काढण्यासाठी १६८० मध्ये औरंगझेबची खानदेश सुभ्याची राजधानी बुऱ्हाणपुरवर हल्ला केला. या हल्ल्यात खूप मोठा मुघल खजिना मराठ्यांना मिळाला.
संभाजी महाराजांची म्हैसूर विजययात्रा
संभाजीराजांनी १६८१ मध्ये, दक्षिणी म्हैसूर मोहिमेची सुरूवात वोडियार राजवंशांविरुद्ध केली. “वोडियार चिक्कदेवराय” त्यावेळी वोडियार राजवंशांचे राजा होते.
चिक्कदेवराय अतिशय चिडखोर राजा होता. संभाजी महाराजांपुढे आत्मसमर्पण न करता त्याने उलट मराठा सैन्यावर हल्ला केला. याचा परिणाम म्हणून, संभाजी महाराज त्यांच्या विशाल सैन्याला घेऊन त्वेषाने लढले आणि लढाई जिंकली.
भविष्यातील स्वराज्यासाठीच्या मोहिमेत योगदान देण्याचे आश्वासन चिक्कदेवराय याने दिले. १६८२ ते १६८६ च्या दरम्यान चिक्कदेवराय यांनी स्वराज्यासाठी मदत करून योगदान दिले, पण काही काळानंतर त्याने मराठ्यांना मदत करण्यास नकार दिला. परिणामी, संभाजी महाराजांनी शेवटी, १६८६ मध्ये म्हैसूरवर कब्जा केला.
संभाजी महाराजांची जंजिऱ्यावरील मोहीम

संभाजी महाराजांपूर्वी, शिवाजी महाराजांनी आधीच सिद्धीचा प्रभाव जंजिरा बेटापुरता मर्यादित केला होता. शंभूराजे यांनी पुन्हा १६८२ मध्ये सिद्धिविरूद्ध मोहिम सुरू केली आणि सलग 30 दिवसांसाठी हल्ला केला.
मराठ्यांनी किल्ल्याचे प्रचंड नुकसान केले, परंतु किल्ल्याच्या संरक्षणास संपूर्णपणे खंडित करण्यात यश आले नाही. मग संभाजी महाराजांनी सैन्याला किनाऱ्यापासून ते जंजिरा किल्ल्याच्या बेटापर्यंत नेण्यासाठी भराव टाकून मार्ग तयार करण्याचा प्रयत्न्य केला.
त्यावेळी, औरंगझेब मराठ्यांचा हा प्रयत्न विफल करण्यासाठी सिद्दीशी हातमिळवणी करतो आणि उत्तरेकडून स्वराज्यावर तसेच रायगडावर आक्रमण करतो. जंजिरा काबीज करण्याआधीच संभाजी महाराजांना जंजिऱ्याची उर्वरित मोहीम सैन्याकडे सोपवून मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी जावे लागले.
दुर्दैवाने, उर्वरित मराठा सैन्याला त्या मोहिमेत यश आले नाही. संभाजी महाराजांच्या इतिहासातील हे एकमेव युद्ध आहे जे पूर्णपणे जिंकता आले नाही, पण संभाजीराजे हरले देखील नाही, कारण सिद्धिला या मोहिमेमध्ये जबरदस्त नुकसान झाले.
संभाजी महाराजांचा पोर्तुगीज किल्ले आणि कॉलनीवर हल्ला
सिद्धीवर असफल आक्रमणानंतर, संभाजीराजांनी पोर्तुगीजांचे अंजदीव किल्ला ताब्यात घेण्यासाठी त्यांचे सेनापती पाठवले होते.
मराठ्यांनी त्या किल्ल्याला नवीन युद्धनौका व सैन्यतळ तयार करण्यासाठी नाविक तळ मध्ये बदलण्याचा विचार केला होता. पण काही कारणास्तव सेनापतींना मोहीम अर्धवट सोडून अंजदीव किल्ल्यापासून परत रायगडावर जावे लागले.
संभाजी महाराजांची पोर्तुगीज मोहीम
संभाजी महाराजांना पोर्तुगिजांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः ती मोहीम हाती घ्यावी लागली. शंभूराजांनी सर्व कॉलनी आणि पोर्तुगीज किल्ल्यांवर कब्जा केला.
बिशप
ख्रिस्ती मंत्र्यांमधील वरिष्ठ सभासद ज्याच्याकडे धार्मिक आणि प्रशासकीय अधिकार असतात. यांना धार्मिक गुरु आणि मंत्र्यांवर देखरेख करण्यासाठी नियुक्त केले जायचे.
पोर्तुगीजांची परिस्थिती इतकी भयंकर झाली की त्यांनी अंजदीव ते कॅथेड्रलला (बिशपच्या अधिकारातील ख्रिश्चन चर्चची प्रमुख इमारत) पळ काढला, जेथे पोर्तुगीस बिशप आणि अधिकाऱ्यांनी चर्चच्या तळमजल्यामध्ये शरण घेतली आणि मुक्ततेसाठी प्रार्थना केली.
पोर्तुगीज मुघलांना व्यापारात मदत करायचे आणि मुघलांना त्यांच्या प्रदेशातून जाण्याची परवानगी द्यायचे. मुगल आणि पोर्तुगीजांच्या संघटना तोडणे हा संभाजी महाराजांचा या मोहिमेमागील मुख्य उद्देश होता.
संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडले
संभाजी महाराजांनी भारतभूमीतून मुघलांना पूर्णपणे उखडून टाकण्याची योजना आखली. त्याचे नियोजन आणि पुढील वाटचालींसाठी संगमेश्वर येथे गुप्त बैठक बोलावली गेली.
गणोजी शिर्के हा संभाजी महाराजांचा मेहुणा होता, संभाजी महाराजांनी त्याला वतनदारी आणि जहागिरी देण्यास साफ नकार केला होता. त्यामुळे, हव्यासापोटी गणोजी शिर्के याने मुघलांशी हातमिळवणी केली.
गनोजीने मुघल सरदार मुकर्रबखान याला संभाजी महाराज संगमेश्वरात असल्याची खबर सांगितली. संभाजीराजे मोहिमेवर जाताना ज्या गुप्त मार्गांचा वापर करायचे तो फक्त मराठ्यांना माहित होता. तो संगमेश्वरातील गुप्त मार्ग गनोजीने मुकर्रबखानला सांगितला.
संभाजी महाराजांनी संगमेश्वरात काही सरदारांना आणि विश्वासू मंत्र्यांना बोलावले होते. गुप्त बैठक झाल्यानंतर गावकऱ्यांच्या आग्रहामुळे त्यांच्या शब्दाला मान देऊन काही काळ ते थांबण्यास तयार झाले.
त्यांनी आपल्याबरोबरची सेना रायगडाकडे रवाना केली आणि बरोबर फक्त २०० सैनिक, मित्र व सल्लागार कवी कलश आणि २५ विश्वासू सल्लागार ठेवले.
संभाजी महाराज गावातून बाहेर पडत असतांना, ५००० मुघल सैन्याने त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना घेरले. शत्रूचे सैन्यबळ संख्येने खूप जास्त असल्याने आपला निभाव लागणार नाही, हे माहित असतानासुद्धा सर्व साथीदार आणि सरदार प्राणपणाने लढले.
स्किर्मिश या गावी भयानक रक्तपात झाला संभाजीराजांच्या सेनेने आपला सर्व पराक्रम लावला. पण दुर्दैवाने संभाजी महाराजांना ते घेराबंदीतून बाहेर काढण्यास अयशस्वी ठरले.

भारताला एकतेचे केंद्र मानून सर्वस्वाचा करणारे आपले खरे नायक:
भारतीय राजे आणि स्वातंत्र्यसेनानी
मला अशा आहे की, हा लेख वाचून आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समजण्यासाठी मदत झाली असेल. तरी, आपण हा लेख शेअर करून सोशिअल माध्यमांद्वारे सर्व मराठी बांधवांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करा. धन्यवाद!
Featured Image Credits: Apricus