गुजरातमधील मराठा शासन – तत्कालीन समृद्ध मराठा प्रांत

by नोव्हेंबर 7, 2023

प्रस्तावना

आज आपण गुजरातमधील मराठा साम्राज्याबद्दल जाणून घेणार आहोत. भारतातील हे समृद्ध राज्य औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रासाठी जगप्रसिद्ध आहे. कपड्याचा व्यवसाय असो किंवा हिऱ्याचा गुजरातमध्ये प्रत्येक व्यवसायासाठी भारतातील हे राज्य पुढारलेले आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून असलेले हे राज्य व्यापाऱ्यांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.

समृद्ध राज्य असल्याने डच, फ्रेंच, पोर्तुगीज, मुघल, इंग्रज अशा सर्वांसाठीच गुजरात हे महत्वाचे व्यापाराचे केंद्र होते. इसवी सन १२९० ते १७०५ अशा जवळपास चारशे वर्ष गुजरात मुस्लिम शासकांच्या ताब्यात होते.

इसवी सन १७०५ पासून खंडेराव दाभाडे या मराठा सेनापतीने महाराणी ताराराणी यांच्या आदेशावरून गुजरात मोहीम सुरु केली. खंडेराव दाभाडे यांनी मुघलांचे गुजरातवरील वर्चस्व कमी केले.

हळूहळू दाभाडे यांनी गायकवाड आणि कांथे, कदम यांच्याबरोबर मिळून गुजरातवर ताबा मिळवला. विकिपेडियानुसार ही मोहीम इ.स. १७१६ पर्यंत चालली.

गुजरात आणि भारताच्या इतर भागात मराठा राजवटीची माहिती देणारा नकाशा
गुजरात आणि भारताच्या इतर भागात मराठा राजवटीची माहिती देणारा नकाशा

शिवरायांच्या काळात मराठ्यांनी गुजरातवर छापे टाकायला सुरुवात आणि चौथ आकारण्यासाठीचा दावा केला होता. असे असले तरी, इ. स. १७१७ पर्यंत व्यवहारी वाटाघाटींमध्ये अधिकृतपणे केले गेले नाही, असे दिसते.

इ.स. १७१७ साली हुसेन अलीबरोबर चौथ आकारणी संदर्भात बोलणी झाली. त्यामध्ये शाहू महाराज यांनी गुजरातबरोबर काही इतर प्रांताच्या दाव्यांना मान्यता देण्यास विनंती केली. त्यानंतर इ. स. १७१९ मध्ये बालाजी विश्वनाथ दिल्लीला गेले तेव्हा पुन्हा एकदा दोन प्रांताचा चौथ मिळावा यासाठी बोलणी केली.

परंतु, हे दावे स्वीकारले नाहीत, त्यामुळे गुजरातवरील मराठ्यांचे छापे टाकण्याचे प्रमाण वाढले. त्यानंतर इ. स. १७२४ मध्ये निजाम-उल-मुल्कने केलेल्या बंडात त्याच्याबरोबर सम्राट अशा दोघांनीही मराठ्यांना त्यांचा पाठिंबा मागितला.

त्यावेळी मराठ्यांनी गुजरात आणि काही इतर प्रांतावरील चौथ आकारणीचे दावे मान्य करावेत अशी मागणी केली. परंतु प्रांतांचे धोरणात्मक महत्त्व आणि आर्थिक सुबत्ता पाहून निजाम आणि सम्राट दोघेही असे थेट वचन देत नव्हते.

त्यानंतर पेशवा बाजीराव यांनी इ. स. १७२८ साली निजाम-उल-मुल्कचा पराभव केला. त्यानंतर गुजरातमधील मराठा हालचालींकडे तसेच त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या सैन्याकडे कानाडोळा करणे भाग पाडले. अशाप्रकारे, इ. स. १७२८ पर्यंत गुजरातमध्ये मराठ्यांची पूर्ण ताकत मुघलांना जाणवली नाही.

गुजरात आणि माळवा मराठा साम्राज्याने तीन टप्प्यात विजय मिळवला. पहिल्या टप्प्यात, मराठ्यांनी चौथ आणि सरदेशमुखीच्या हक्काची स्थापना केली, जी प्रांतांमधील महसूल आणि सैन्य जमा करण्याचा अधिकार होता. या हक्काच्या मदतीने, मराठ्यांनी गुजरात आणि माळव्यात आपला प्रभाव वाढवला.

दुसऱ्या टप्प्यात, मराठ्यांनी प्रांतांची विभागणी मराठा सरदारांच्या प्रभावाच्या क्षेत्रात केली. यामुळे, प्रांतांमध्ये मराठ्यांचे वर्चस्व मजबूत झाले.

तिसऱ्या टप्प्यात, मराठ्यांनी गुजरात आणि माळवावर पूर्ण नियंत्रण मिळवले. त्यांनी या प्रांतांना आपले प्रांत म्हणून घोषित केले.

मे १७२६ मध्ये, गुजरातचा शाही गव्हर्नर, सरबुलंद खान याने सुभ्यावरील चौथ आणि सरदेशमुखींवर मराठ्यांचा दावा मान्य केला. चौथ आणि सरदेशमुखी हे तत्त्व दख्खनमध्ये मान्य झाल्यानंतर, मराठे शस्त्रांच्या बळावर पराभूत होऊ शकत नाहीत हे दाखवून दिले तर गुजरातमध्ये अशाच व्यवस्थेला थोडासा नैतिक आक्षेप आक्षेप घेण्याचे फारसे कारण उरणार नाही.

चौथ आणि सरदेशमुखी देऊनही, मराठा सरदारांच्या लुटमारीच्या कारवाया संपल्या नाहीत. दाभाडेचे मुख्य लेफ्टनंट पिलाजी गायकवाड आणि कांथा कदम यांच्यात चौथच्या विभागणीवरून वाद झाला. यामुळे, त्यांच्यात सतत संघर्ष होत असे.

बाजीरावांनी शाहूंनी नेमलेल्या गुजरातच्या चौथच्या प्रतिनिधीचा दावा खोटा ठरवला. दुसरीकडे, बाजीराव दख्खन आणि नंतर माळव्यात व्यस्त होते. दरम्यान, मराठा सरदारांनी हळूहळू गुजरातच्या दक्षिणेतील २८ जिल्ह्यांचा ताबा घेतला. १७३० मध्ये, बाजीराव गुजरातच्या राजकारणात परतले.

बाजीरावांनी गुजरातवर चौथ आणि सरदेशमुखी अधिकार मिळवण्यासाठी अभाई सिंग यांच्याशी एक करार केला. या करारानुसार, बाजीरावने गायकवाड आणि कांथा कदम यांना गुजरातमधून बाहेर काढावे या अटीवर अभाई सिंगने बाजीरावांना १३ लाख रुपये दिले.

मराठ्यांनी इ. स. १७३२ पर्यंत न केवळ चौथ आणि सरदेशमुखी अधिकारांना राज्यपालांची मान्यता मिळवून घेतली होती, तर त्यांनी अनेक जिल्ह्यांवर ताबा मिळवला जेणेकरून ते त्यांचे दावे अधिक प्रभावीपणे अंमलात आणू शकत होते.

इ. स. १७३१ साली झालेल्या दाभोईच्या लढाईत बाजीरावांनी त्रिंबकराव दाभाडे यांचा पराभव केला. त्यानंतर शाहू महाराजांद्वारे केलेल्या निवाड्यात दाभाडेंना गुजरातचा बहुतांश भाग मिळाला. गुजरात कालांतराने गायकवाड घराण्याच्या अधिपत्याखाली आला, तेव्हा त्यांनी दाभाडे यांना गुजरातमधून काढून टाकले.

मराठ्यांना जबरदस्तीने गुजरातमधून काढण्यासाठी जीवावर उदार असलेला अभाई सिंग इ. स. १७३३ मध्ये पिलाजीराव गायकवाड यांना एका परिषदेसाठी आमंत्रित करून त्यांची हत्या करतो. या हत्येमुळे अभाई सिंगला मात्र फार उपयोग झाला नाही. कारण, उमाबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी एकत्र येऊन दामाजीरावांनी गुजरातमधील मराठ्यांचे वर्चस्व वाढवले.

अभय सिंगला आता समजते की आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, त्यामुळे ते मारवाडला पलायन करतात. यावेळी, तिसऱ्या टप्प्यासाठी म्हणजेच प्रदेश जोडणीसाठी लागणारा पाय तयार झाला होता. आता पद अधिकृत करण्यासाठी केवळ बादशाहकडून योग्यरीत्या अनुदान मिळणे आवश्यक होते.

अ. क्र.
गुजरातच्या मराठा प्रांताचे खरे सत्ताधारी

सत्तेची कारकीर्द
१.
खंडेराव दाभाडे
१७०५ – १७२९
२.
त्रिंबकराव दाभाडे
१७२९-१७३१
३.
नाममात्र – यशवंतराव दाभाडे (अज्ञान) (सत्तेत – उमाबाई दाभाडे), प्रतिनिधी* – पिलाजीराव गाईकवाड (मुतलिक)
१७३१-१७३२
४.
नाममात्र – यशवंतराव दाभाडे (अज्ञान) (सत्तेत – उमाबाई दाभाडे), प्रतिनिधी* – दामाजीराव गाईकवाड
१७३२-१७६८

*सेनापतीच्या अधिकारासह मुतालिक: डेप्युटी

दाभाडे घराणे

मराठा घोडेस्वार - गुजरातमधील मराठा राजवट

इ. स. १७२९ मध्ये खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्रिंबकराव दाभाडे यांनी गुजरातचा कारभार हाती घेतला. वडिलांप्रमाणेच साहसी आणि पराक्रमी असल्याने त्यांनी लवकरच राज्यकारभार सुरळीत केला. मराठा सेनापती आणि गुजरातचे अधिपती असतानाही ते मराठा साम्राज्याचा एक भाग होते.

त्यामुळे त्यांना मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा येथील छत्रपती शाहू महाराज यांचे आदेश पाळणे बंधनकारक होते. त्रिंबकरावांच्या काळात बाळाजी बाजीराव भट हे प्रधान पेशवा होते. सरसेनापती असल्याने त्यांच्या मते गुजराचा त्यांच्याकडे असावा असे बाजीरावांना नेहमी वाटे. त्यामुळे त्रिंबकरावांना त्यासाठी सक्ती केले गेली. परंतु, त्रिंबकरावांनी त्यासाठी साफ नकार दिला आणि पेशव्यांविरुद्ध मोहीम सुरु केली.

त्रिंबकराव यांनी निज़ाम, गायकवाड, कदम बांडे यांच्याबरोबर मिळून पेशव्यांच्या या निर्णयाविरुद्ध बंड केले. ज्यामुळे १ एप्रिल, इ. स. १७३१ मध्ये पेशवा बाजीराव प्रथम यांनी दाभोईच्या लढाईत हा बंड मोडून काढला. परंतु, दुर्भाग्यवश या लढाईत भानुसिंग ठोके या त्रिंबकरावांच्या मामांद्वारे मारलेल्या बंदुकीच्या गोळीने त्रिंबकरावांचा मृत्यू झाला.

पेशवे बऱ्याचदा काही मोहिमा शाहू महाराजांच्या परस्पर करत. जसे राजा छत्रसाल यांना केलेली मदत याची कल्पना शाहू महाराजांना नव्हती तसेच शाहू महाराजांना दभोईच्या लढाईची कल्पना नव्हती.

शाहू महाराजांचे एक मोठे सेनापती लढाईत मारले गेल्याने साहजिकच शाहू महाराज बाजीरावांवर नाराज होते. त्यामुळे न्यायनिवाडा करण्याकरिता छत्रपती शाहू महाराजांनी त्रिंबकरावांच्या आई उमाबाई आणि बाजीरावांना सातारा येथे बोलावून घेतले.

जरी स्वतः मारले नसले, तरी एका आईने त्यांच्या मुलाला गमावले होते. त्यामुळे बाजीरावांनी स्वतःहून उमाबाई दाभाडे यांची पाय पकडून क्षमा मागितली.

सातारा येथे झालेल्या या न्यायनिवाड्यात छत्रपती शाहूंनी उमाबाईंना त्रिंबकरावांनंतर गुजरातच्या सेनापती पदावर नियुक्त केले. उमाबाईनंतर मात्र दाभाडे परिवाराचे गुजरातमधील वर्चस्व कमी झाले आणि गायकवाड घराण्याचे वर्चस्व वाढले.

गायकवाड घराणे

खंडेराव यांच्या सेनेत महत्वाचे सैन्य अधिकारी असलेले पिलाजीराव गायकवाड यांनी गुजराची धुरा सांभाळली. गुजरातमध्ये गायकवाड घराण्याची सुरुवात करून दाभाडे यांनी सुरु केलेल्या या मोहिमेला पिलाजीराव गायकवाड यांनी सार्थ केले.

खंडेराववांसारखेच पिलाजीरावही कुशल रणनीतीतज्ज्ञ, साहसी आणि पराक्रमी होते. त्यांनी इ. स. १७२० च्या सुरुवातीला त्यांनी सोनागढ बनवून या किल्ल्यावरून तेथील कारभार पहिला. त्यांनी १७२१ मध्ये बडोदा आणि त्यानंतर सुरत तसेच इतर भाग ताब्यात घेतला आणि खऱ्या अर्थाने गुजरातचे पहिले मराठा शासक बनले.

गायकवाड घराण्याने बडोदा शहरातून सर्व कारभार पहिला. याच घराण्यात १२ डिसेंबर १८५६ मध्ये गादीवर बसलेल्या खंडेराव गायकवाड द्वितीय यांचा २० नोव्हेंबर १८७० मध्ये अकाली मृत्यू झाला. त्यांना मुल नसल्याने खंडेराववांच्या पत्नी एका मुलाला दत्तक घेतले. या मुलाचे नाव त्यांनी सयाजीराव ठेवले.

त्यांचा भाऊ मल्हारराव गायकवाड यांना बडोदा येथील गादीवर बसवण्यात आले. परंतु, त्यांच्या खूप क्रूर, अत्याचारी, मनमानी कारभार, आणि बेजबाबदारपणामुळे इ. स. १८७५ ब्रिटिशांनी त्यांना काढून टाकले.

तापी नदीवर बांधलेला उकई धरणावरील गायकवाडी किल्ला
तापी नदीवर बांधलेला उकई धरणावरील गायकवाडी किल्ला

सयाजीरावांचा काळ

त्यानंतर मात्र जमनाबाई यांचा दत्तक मुलगा सयाजीराव हे बडोद्याचे शासक बनले. त्यांनी ६३ वर्ष राज्य केले आणि त्यांच्या कारकिर्दीत बडोद्याचा कायापालट केला. त्यांच्या कारकिर्दीत ते हिंदुस्तानातील सर्वांत श्रीमंत शासकांपैकी एक होते. त्यांना गुजरातमधील बडोद्याच्या इतिहासातील महान आणि लोकप्रिय शासक मानले जाते.

निष्कर्ष

गुजरातमधील मराठा साम्राज्य हे एक महत्वाचे ऐतिहासिक कालखंड आहे. दाभाडे आणि गायकवाड या दोन घराण्यांनी गुजरातच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या लेखात आपण गुजरातमधील बडोद्याच्या दोन महत्वाच्या दाभाडे आणि गायकवाड घराण्यांबद्दल जाणून घेतले. आशा करतो की, आपणाला हा लेख आवडला असेल. तरी हा लेख आपल्या मित्र आणि परिवारामध्ये शेअर करा. जेणेकरून त्यांनाही मराठ्यांच्या या शाही घराण्यांबद्दल माहिती मिळेल.

उद्धरण

प्रतिमा क्रेडिट्स:

१७५८ मध्ये मराठा साम्राज्य, श्रेय: Fidolex

तापी नदीवर बांधलेला उकई धरणावरील गायकवाडी किल्ला, श्रेय: Ashishgavit647

Subscribe Now For Future Updates!

Join and recieve all future updates for FREE!

Congrats!! Now you are part of HN family!

Pin It on Pinterest