मराठा साम्राज्याचा ज्वलंत इतिहास- १६३०-१८१८

by जुलै 24, 2021

मराठा साम्राज्य (मर~हाटा) म्हणून अस्तित्वात आलेले मराठा संघराज्य हे कित्तेक मराठी माणसांच्या बलिदानावर उभे राहिलेले स्वाभिमानी राज्य होते.

या साम्राज्याचे अस्तित्व जरी अधिकृतपणे १६७४ पासून १८१८ पर्यंत होते. परंतु, स्वराज्यासाठीची घौड दौड सुरु झाली ती इसवी सन १६४६ मध्ये मावळे आणि शिवरायांनी घेतलेल्या स्वराज्यस्थापनेच्या प्रतिज्ञेबरोबर. भरभराटीच्या काळात या साम्राज्याच्या विविध प्रांतांमध्ये २५० दशलक्ष एकर (१ दशलक्ष किमी वर्ग) किंवा आशिया खंडाच्या एक तृतीयांश भागाचा समावेश होता.

राज्यातील परंपरेनुसार अष्टप्रधानांच्या सल्ल्याने राजे राज्य करत असत. जेंव्हा ब्रिटिशांनी भारतामध्ये आपले बस्तान वाढविले तेव्हा त्यांच्या प्रादेशिक महत्वाकांक्षांना मराठा साम्राज्य एक मोठा धोका ठरले होते. मराठा साम्राज्य भोसल्यांच्या राजवंशाशी संबंधित होते.

ब्रिटीशांसोबत अनेक युद्ध मालिका लढल्यानंतर, १८१८ मध्ये मराठ्यांचा पराजय झाला. ब्रिटीशांच्या श्रेष्ठत्वाखाली ह्या साम्राज्याच्या अवशेषांमधून अनेक रियासती उदयास आल्या.

तथापि, मराठा साम्राज्य आजही भारतीय राज्य महाराष्ट्र म्हणजेच “महान राष्ट्र” म्हणून जिवंत आहे आणि ज्याचे निर्माण १९६० मध्ये मराठी भाषी राज्य म्हणून झाला होता. म्हणून त्याला मराठी साम्राज्य देखील म्हणले जाते.

धर्म आणि जातींनमधील वैविध्यता असतांना देखील सामाजिक गतिशीलता आणि जातीमधील एकोपा यासारख्या अनेक परंपरा भारताच्या जीवनाचे वैशिष्ट्य सांगते.

मुस्लीम मुघलसाम्राज्यापुढे अनेक वर्षे उभे असताना देखील हे साम्राज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या मूलभूत विश्वासांपैकी एक असलेल्या धार्मिक सहिष्णुतेने परिपूर्ण होते.

धर्म आणि वर्ग ह्यामध्ये अनेकदा विभागल्या जाणाऱ्या जगामध्ये अश्या सुसंघटीत राज्यसंस्थेची गाथा ऐकली जाण्याची गरज आहे, जिथे प्रत्येक प्रतिभावंत यशस्वी होऊ शकतो, जिथे लोक छळ किंवा भेदभाव न अनुभवता आपल्या श्रद्धेची साधना करू शकत असत.

असहिष्णू संस्था आणि धार्मिक संघर्ष ह्या दोन बाबी ठेवल्यानंतरच वेगवेगळ्या जातीचे लोक कश्याप्रकारे संवादाने राहू शकतात याचा संतुलित इतिहास या साम्राज्याच्या अभ्यासाने पुन्हा घडविला जाऊ शकतो.

मराठा राज्यात किती महाल होते?

मराठा राज्यात महालांपेक्षा किल्ल्यांना जास्त महत्व होते. याचा अर्थ असा होत नाही कि, मराठा राज्यात महाले नव्हती. शिवकालीन इतिहासात वर्णन केले आहे कि त्याकाळी प्रत्येक किल्ल्यावर दगडी चौथऱ्यावर सागवानी लाकडापासून प्रशस्थ महालांची बांधणी केली जायची.

आज चांगल्या स्थितीतील मराठाकालीन महाले पाहायची असतील तर कोल्हापूरमधील शाहू पॅलेस, शालिनी पॅलेस (ब्रिटिशकालीन) यांना आपण भेट देऊ शकता. शालिनी पॅलेस जरी ब्रिटिशकालीन असला तरी, त्यांच्या वंशातील राजाराम III यांच्या कारकिर्दीत बांधलेला तो पॅलेस मराठा वैभवाचा साक्षीदार आहे.

पुण्यातील शनिवारवाडाही शाहू महाराजांनी खास मराठा सरसेनापती पेशवा बाजीराव I यांच्याकरिता बांधला. यामध्ये अनेक महाले होती, तसेच बाजीरावांनी मस्तानीबरोबरील दुसऱ्या प्रेमविवाहानंतर एक नवीन सातमजली महाल बांधला. त्याचे नाव होते “मस्तानी महाल.”

याव्यतिरिक्त, महाराष्ट्रभर फिरल्यास आपल्या लक्षात येईल कि, पेशवा काळात मराठा सरदारांनी अनेक महाले बांधली. अलीकडेच मी अशाच एका महालाला भेट दिली, ज्याचे नाव आहे, “महादजी शिंदे वाडा.”

आपण जर कधी सिद्धिविनायक या अष्टविनायक गणपतींमध्ये मोडणाऱ्या सिद्धटेक या तीर्थक्षेत्राला गेलात, तर आपल्याला या पेशवेकालीन वाड्याला भेट देता येईल. हा वाडा सध्या मोडकळीस आला असून सध्या याचे दोन माजले शेष आहेत. स्थानिक लोकांच्या मते, पूर्वी हा महाल सात मजली होता.

कर्मवीर भाऊराव यांच्या काळात साताऱ्याच्या महाराजांनी हा वाडा रयत शिक्षण संस्थेला दान केला होता. त्यामुळे गेली काही दशके या वाड्यात विद्यालयाचे शैक्षणिक काम चालू होते. महादजी शिंदेंच्या स्मरणार्थ या विद्यालयाला “महादजी शिंदे विद्यालय” असे नाव देण्यात आले होते. सध्या विद्यालयाची नवीन इमारत तयार झाल्याने, हा वाडा पूर्णपणे मोकळा आणि विरान झाला आहे.

मराठा साम्राज्याचा इतिहास

बिजापुरच्या आदिलशाह आणि मुघल सम्राट औरंगजेब सोबतचे गनिमी युद्ध आणि रयतेचे या आक्रमणकर्त्यांनी केलेल्या शोषणानंतर, याच रयतेने शिवरायांना देव मानले आणि शिवरायांना राजगड राजधानी असलेला स्वतंत्र मराठा राष्ट्र १६७४ मध्ये मिळाला.

शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० साली झाला. ते त्यांच्या पश्चात एक विस्तृत पण त्यांच्या नसण्याने असुरक्षित राज्याला सोडून गेले. मुघलांनी आक्रमण करून १६८२ ते १७०७ ह्या काळात २५ वर्षे अयशस्वी युद्ध लढवले.

त्यांच्या कारकिर्दीत काही परिस्थितींमध्ये शाहूंनी सरकारचे प्रमुख म्हणून एक पेशवा (पंतप्रधान) नियुक्त केले. शिवाजी राजांचे नातू शाहू यांनी १७४९ पर्यंत राज्य केले. त्यांना “राजर्षी” ही पदवी कानपूरच्या कुर्मींनी बहाल केली.

शाहूंच्या मृत्युनंतर १७४९ ते १७६१ पर्यंत पेशवे, साम्राज्याचे प्रमुख नेते होते, तर शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी साताऱ्यामधून राज्य चालवीत होते.

उपखंडातील मोठा भाग मराठा साम्राज्याने व्यापलेला असताना अठराव्या शतकामध्ये पेशवा आणि त्यांच्या सरदारांमध्ये किंवा सेनापतींमध्ये मतभेद होईपर्यंत मराठ्यांनी ब्रिटिश सैन्याला वेठीस धरून ठेवले.

अठराव्या शतकामध्ये शाहू आणि बाजी पेशवा यांचा काळ मराठा साम्राज्याचा सर्वोच्च काळ होता. १७६१ मधल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पराजय झाल्यानंतर त्यांच्या साम्राज्याचा विस्तार थांबला आणि पेशव्यांची ताकद कमी झाली.

१७६१ मध्ये, पानिपतच्या युद्धातील पराजयानंतर पेशवांनी त्यांचे राज्यावरचे नियंत्रण गमावले. अनेक सरदार जसे शिंदे, होळकर, गायकवाड, पंत प्रतिनिधी, नागपूरचे भोसले, भोरचे पंडित, पटवर्धन, आणि नेवाळकर त्यांच्या त्यांच्या प्रदेशाचे राजे झाले.

या साम्राज्याने एक मुक्त संघराज्य समोर आणले ज्यामध्ये राजकीय सत्ता “पंचारात्ता“ मराठा राजघराण्यांकडे म्हणजे पुण्याचे पेशवा, माळवा आणि ग्वालीअरचे सिंधीया (मूळचे शिंदे), इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड यांच्याकडे होती.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सिंधिया आणि होळकर ह्यांच्यातील वैमनस्याचे संघटनेच्या कामकाजावर वर्चस्व होते. त्याच प्रकारे तीन एंग्लो-मराठा युद्धांमध्ये ब्रिटीश आणि ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी ह्यांच्यातील वाद देखील परिणामकारक होते.

१८१८ मधील तिसऱ्या एंग्लो-मराठा युद्धामध्ये शेवटचे बाजीराव पेशवा-२ यांचा ब्रिटीशांकडून पराजय झाला. त्यानंतर बरेचसे मराठा साम्राज्य ब्रिटिशांनी व्यापले होते, तरी १९४७ मध्ये भारत स्वतंत्र होईपर्यंत काही मराठा राज्ये अर्ध-स्वतंत्र रियासत म्हणून कायम राहिले.

श्री. छत्रपती शिवाजी महाराज (क. १६२७-१६८०)

हिंदू मराठा डेक्कन पठाराच्या भागातील साताऱ्याच्या आसपासच्या देश प्रांतामध्ये स्थायिक झाले, जिथे पठार पश्चिमी घाटातील डोंगरांच्या पूर्व उत्तर वर जाऊन मिळतो, आणि इथल्या प्रांतामध्ये ते उत्तरीय भारतावर राज्य करत असलेल्या मुस्लिम मुघलांना घुसखोरी करण्यापासून रोखण्यामध्ये यशस्वी ठरले.

त्यांच्या नेत्याच्या, शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली, मराठांनी स्वतःला बिजापुरच्या मुस्लीम सुल्तानांनपासून उत्तर पूर्वेकडे स्वतंत्र केले, आणि अधिकच आक्रमक होऊन मुघल प्रदेशांवरती हल्ले वाढविण्यात आले, आणि १६६४ मध्ये सूरत मधील मुघल बंदराची खंडणी देखील घेतली.

१६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी स्वतः सम्राट म्हणून (छत्रपती) ही पदवी स्वीकारली. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलशाली शत्रूंचे मनोबल खच्ची करणारे अचूक हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी अतिशय योग्य प्रकारे वापरले आणि विकसित केले.

१६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यू पर्यंत मराठांनी विस्तार करून मध्य भारतातील बराचसा भाग व्यापला होता परंतु नंतर त्यांचा मुघल आणि ब्रिटीशांकडून पराजय झाला.

भारतीय इतिहासकारक त्र्यंबक शंकर शेजवलकर, शिवाजी महाराज विजयनगर साम्राज्यापासून प्रेरित झाले होते, जे मुस्लिमांच्या दक्षिण भारतातील घुसखोरीविरुद्ध तटबंदी होती.

तेव्हांच्या मैसूरचे राजा कंठीराव नरसराजा वोडेयार ह्यांची बिजापुरच्या सम्राटांवरचा विजय देखील शिवाजी महारांसाठी प्रेरणादायक होते. [१] शिवाजी महाराजांच्या दृष्टीने देव देश आणि धर्म ह्यांच्यातील एकसंधपणा महत्वपूर्ण होता.

श्री. छत्रपती संभाजी महाराज (क. १६८१-१६८९)

शिवाजीं महाराजांचे दोन मुलगे होते: संभाजी आणि राजाराम. संभाजी हे त्यांचे मोठे सुपुत्र होते जे अनेक देशांमध्ये लोकप्रिय होते. ते एक सक्षम राजकारणी आणि उत्तम योद्धा तर होतेच तसेच ते एक उत्तम कवी देखील होते.

१६८१ मध्ये संभाजींनी स्वतः राजगादीवर बसून आपल्या वडिलांची विस्तारवादी धोरणे पुढे सुरु ठेवली. यापूर्वी संभाजींनी पोर्तुगीज आणि मैसूरच्या चिक्क देव राया ह्यांना पराजित केले होते.

राजपूत मराठा युती आणि डेक्कन सल्तनत संपवण्यासाठी खुद्द औरंगजेबने १६८२ मध्ये दक्षिणेकडे कूच केली. संपूर्ण शाही दरबार, प्रशासन आणि सुमारे ४००,००० सैनिकांचे सैन्य घेऊन बिजापूरची आणि गोवळकोंड्याची सल्तनत जिंकण्यासाठी त्यांनी चढाई केली.

पुढची आठ वर्षे संभाजी ने एकही युद्ध किंवा किल्ला औरंगजेबाला मिळू न देता मराठ्यांचे नेतृत्व केले. औरंगजेबचा पराजय निश्चितच केला.

तथापि, १६८९ मध्ये संभाजीं राजांच्या नातेवाइकांनी त्यांना दगा दिला, आणि त्यांच्या मदतीने औरंगजेबाने संभाजींना ठार केले. औरंगजेब त्यांना जिंकण्यामध्ये यशस्वी झाला होता. इ.स. १६८७ ते ८८ ला महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला आणि परिस्थिती कठीण झाली होती.

श्री. छत्रपती राजाराम महाराज (क. १६८९-१७०७)

राजाराम, संभाजींचे भाऊ आता सिंहासनावर आले. काकरखानला छत्रपती राजाराम महाराज आणि एकनिष्ठ सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयना नदीच्या काठावर पराजित केले, १० जून ते १० ऑगस्ट १६८९ ह्या काळात राजाराम प्रतापगडावर होते.

सातारा जी राजारामांनी आपली राजधानी केली होती, वेढ्यात अडकली आणि अंततः मुघलांच्या स्वाधीन करण्यात आली.

त्याच वेळी जिंजीमध्ये नऊ वर्षांपूर्वी आश्रय घेतलेल्या संभाजींचे निधन झाले.

महाराणी ताराबाई

त्यांच्या विधवा पत्नी ताराबाइंनी आपल्या मुलाच्या शिवाजीच्या नावाने पुढील कारकीर्द सांभाळली.

जेव्हां तिने युद्धाची मागणी केली तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यावेळी १७०५ पर्यंत ताराबाइंनी वीरतेने मराठा साम्राज्याचे मुघलांविरुद्ध नेतृत्व केले.

त्यांनी नर्मदा नदी पार करून माळवा मध्ये प्रवेश केला आणि मग त्या मुघलांच्या हद्दीत गेल्या. माळवाचे युद्ध मराठा साम्राज्यासाठी निर्णायक होते.

यानंतर मुघलांनी भारतीय उपखंडावरील आपले सदा अग्रगण्य असलेले स्थान गमावले, त्यांनतरचे मुघल सम्राट हे केवळ नाममात्र राजे होते.

बराच काळ चाललेल्या आणि निकराच्या युद्धानंतर मराठांचा विजय झाला. मराठा साम्राज्याचा विस्तार मुख्यत्वे त्यांच्या सैनिक आणि सेनापतींच्या महत्वपूर्ण सहभागामुळे शक्य झाला.

या विजयामुळे पुढील शाही विजयासाठीचा पाया रोवला गेला.

श्री. छत्रपती शाहू महाराज (क. १७०७-१७४९)

१७०७ मध्ये सम्राट औरंगजेबच्या मृत्यू नंतर, शाहूजींची, संभाजींचे पुत्र (आणि शिवाजींचे नातू), पुढील सम्राट बहादूर शाह यांच्याकडून सुटका करण्यात आली.

त्यांनी तत्काळ मराठा राजगादी सांभाळून त्यांच्या काकू ताराबाइंना आणि त्यांच्या मुलाला आव्हान केले.

यामुळे मुघल-मराठा युद्धाचे त्रिकोणीय स्थितीमध्ये रुपांतर झाले. १७०७ मध्ये सततच्या मराठा साम्राज्याच्या गादीवरून वाद झाल्यामुळे सातारा आणि कोल्हापूर ही राज्ये अस्तित्वात आली.

१७३१ मध्ये वारणा करारामध्ये दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्त्वात पुष्टी केली होती.
१७१३ मध्ये फार्रुखसियारने स्वतःला मुघल सम्राट घोषित केले.

त्याची राज्याची मागणी प्रामुख्याने दोन भावांवर अवलंबून होती जे सैयीद्स म्हणून ओळखले जात, ज्यामधील एक अलाहबादचा शासक आणि दुसरा पटनाचा शासक होता.

तथापि, दोन्ही भाऊ सम्राटपासून वेगळे झाले होते. सैयीद्स आणि पेशवा बाळाजी विश्वनाथ, शाहूंचे नागरी प्रतिनिधी, यांच्यामधील वाटाघाटीमुळे मराठांनी सम्राट विरुद्ध बंड पुकारला.

परसोजी भोसले ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठांचे एक सैन्य आणि मुघलांचे सैन्य ह्यांनी बिनविरोध दिल्लीकडे कूच केली आणि सम्राटला पदच्युत करण्यामध्ये यशस्वी झाले.

या मदतीच्या बदल्यात बाळाजी विश्वनाथने भरघोस मागण्या असलेल्या कराराची मागणी केली. आणि शाहूंना डेक्कनवर मुघलांचे साम्राज्य मान्य करावेच लागले, शाही सैन्य तयार करण्यासाठी सैन्य आणि वार्षिक खंडणी देखील द्यावी लागत असे.

त्याबदल्यात त्याला फरमान किंवा शाही निर्देश, मराठा जन्मभूमीमधील स्वराज्याची किंवा स्वातंत्र्याची हमी, त्याचबरोबर चौथ आणि सरदेशमुखांना [२] (एकूण महसुलाच्या ३५ टक्के रक्कम) संपूर्ण गुजरात, माळवा आणि मुघल डेक्कनचे आत्ताच्या सहा प्रांतांवर हक्क मिळाले.

या करारामुळे शाहुजींच्या आई येसूबाईंना देखील मुघल अटकेतून सुटका मिळाली.

अमात्य रामचंद्र पंत बावडेकर (१६५०-१७१६)

रामचंद्र पंत अमात्य बावडेकर हे न्यायालयीन प्रशासक होते जे स्थानिक नोंदी करणारे (कुलकर्णी) यांच्याकडे लहानाचे मोठे झाले होतेआणि पुढे शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अष्टप्रधान (सल्लागार समिती) मधील एक सदस्य म्हणून नेमले गेले.

ते शिवाजींच्या काळातील नंतरच्या पेशवांच्या उदया पूर्वीचे प्रमुख पेशवे होते, ज्यांनी शाहुजींनंतर साम्राज्यावर नियंत्रण मिळवले.

मराठा साम्राज्याच्या कठीण काळात त्यांनी त्यांच्या सामर्थ्याने आणि समर्पण भावनेने स्वराज्याचे रक्षण करण्यात मोठा हातभार लावला.

१६८९ मध्ये जेव्हां छत्रपती राजारामांनी जिंजी मध्ये आश्रय घेतले होता, त्यांनी पंतांसाठी जाण्यापूर्वी एक “हुकुमत पन्हा” जारी केला होता.

रामचंद्र पंत ह्यांनी अनेक आव्हानांना जसे वतनदारांकडून (मराठा साम्राज्यातील स्थानिक अधिकारी, अपर्याप्त अन्न आणि साम्राज्याबाहेरून युद्धातील आश्रितांचे पेव.) विश्वासघाताला सामोरे जात संपूर्ण साम्राज्य व्यवस्थापित केले.

त्यांना महान मराठा योद्धा संताजी घोरपडेमिळाली आणि धनाजी जाधव ह्यांच्याकडून सैन्याची मदत मिळाली.

कित्येक प्रसंगांमध्ये त्यांनी स्वतः मुघलांच्या विरोधातील युद्धांमध्ये भाग घेतला जिथे ते छत्रपती राजाराम यांच्या अनुपस्थीतीत एकदिलाने सारखे लढले.

१६९८ मध्ये, त्यांनी “हुकुमत पन्हा” हे पद सोडले जेव्हां राजाराम ह्यांनी त्यांच्या पत्नी ताराबाईंना हे पद दिले, ज्यांनी पंतांना वरिष्ठ प्रशासक ह्या पदवीने पुरस्कृत केले होते.

त्यांनी “आज्ञापत्र” लिहिले ज्यामध्ये त्यांनी युद्धाची, किल्ल्यांची देखरेखसंबंधी अनेक तंत्र स्पष्ट केली होती.

शाहुजींविरुद्ध ताराबाइंप्रतीच्या निष्ठेमुळे (ज्यांना स्थानिक अधिकाऱ्यांनी मदत केली होती) १७०७ मध्ये शाहुजींच्या आगमनानंतर त्यांना बाजूला करण्यात आले.

१७१३ मध्ये राज्याचे पेशवा हे पद बाळाजी विश्वनाथ यांना देण्यात आले. १७१६ मध्ये पन्हाळा किल्ल्यावर बाळाजी पंत ह्यांचे निधन झाले.

थोरले पेशवा बाजीराव (१७२०-१७४०)

एप्रिल १७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ ह्यांच्या मृत्युनंतर त्यांचे पुत्र, बाजी राव १ यांची पेशवा म्हणून शाहुजींनी नियुक्ती केली, जे अत्यंत मवाळ स्वभावाचे होते.

शाहुजींमध्ये कौशल्य ओळखण्याची महान क्षमता होती आणि ज्यामुळे सक्षम लोकांना त्यांच्या सामाजिक स्थितीची पर्वा न करता सत्तेत आणून एक सामाजिक क्रांती घडली.

हे मराठा साम्राज्यातील कमालीच्या सामाजिक सहनशीलतेचे सूचक होते आणि ज्यामुळे साम्राज्याच्या वेगवान विकास झाला.

श्रीमंत बाजीराव विश्वनाथ भट्ट (१८ ऑगस्ट, १६९९-२५ एप्रिल, १७४०), जे बाजीराव १ म्हणून देखील ओळखले जात, हे चौथ्या मराठा छत्रपती (सम्राट) शाहू ह्यांचे १९१७ आणि बाजीराव ह्यांच्या मृत्यू च्या मधल्या काळात पेशवा (पंतप्रधान) म्हणून काम करणारे प्रख्यात जनरल होते.

त्यांना थोरले बाजीराव म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्या वडिलांप्रमाणेच, एक ब्राम्हण असून देखील त्यांनी त्यांच्या सैनिकांचे नेतृत्व केले. त्यांच्या हयातीत ते एकही युद्ध हरले नाहीत.

मराठा साम्राज्याच्या संस्थापकांनी स्थापित केलेल्या साम्राज्याच्या विस्ताराचे श्रेय देखील त्यांना दिले जाते, ज्या साम्राज्याने त्यांच्या कारकीर्दीमध्ये यशाचे शिखर गाठले होते.

त्यामुळेच बाजीराव हे सर्व नऊ पेशवांपैकी सर्वात लोकप्रिय मानले गेले. उत्तर भारतात मराठी सत्तेला पसरण्याची किती मोठी संधी आहे, याचा अंदाज त्या लहान वयातच बाजीने घेतला होता.

पेशवा बाळाजी बाजीराव (१७४०-१७६१)

बाजीराव यांचे पुत्र, बाळाजी बाजीराव (नानासाहेब), यांना शाहूंनी पेशवा म्हणून निवडले. १७४१ ते १७४५ मधील काळ हा डेक्कनसाठी आधीच्या काळाच्या विपरीत तुलनात्मक दृष्टिने बराच शांत होता. १७४९ मध्ये शाहुजींचा मृत्यू झाला.

नानासाहेबांनी शेतीला प्रोत्साहन दिले, ग्रामस्थांना सुरक्षा प्रदान केली आणि त्यांच्या राज्याच्या प्रदेशांमध्ये चिन्हांकित विकास घडवून आणला. पुढील विस्तार रघुनाथ राव, नानासाहेबांचे भाऊ ह्यांच्या कारकिर्दीत झाला.

१७५६ मध्ये अहमद शाह दुर्रानी यांनी दिल्लीला लुटल्यानंतर अफगाणिस्तानने माघार घेतल्यानंतर पंजाब वरती दबाव आणला. दिल्ली प्रमाणेच लाहोरमध्ये देखील मराठांचे वर्चस्व होते.

१७६० पर्यंत, डेक्कन मध्ये हैदराबादच्या निजामाच्या पराजयानंतर, मराठा साम्राज्याचा प्रदेश त्यांच्या सर्वोच्च मर्यादेपर्यंत म्हणजेच २५० दशलक्ष किमी किंवा भारतीय उपखंडातील एक तृतीयांश भागावर पसरला.

साम्राज्याचे पतन

पेशवाने अफगाणच्या नेतृत्वाखाली भारतीय मुस्लिमांच्या युतीला आव्हान करण्यासाठी सैन्य पाठवले ज्यामध्ये रोहील्लाज, शुजाह-उद-दौला, नुजीब-उद-दौला ह्यांचा समावेश होता आणि मराठा सैन्याला १४ जानेवारी, १७६१ मध्ये, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात निर्णायकपणे हरविण्यात आले.

सूरज माल आणि राजपूत, ज्यांनी निर्णायक क्षणी मराठा युती सोडली आणि एक मोठी लढाई लढवून आणली, यांनी मराठ्यांना बेबंद केले.

त्यांच्या रसद पुरविण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले, अश्यातच सलग तीन दिवस अन्न पाणी न मिळाल्याने हताश होऊन मराठ्यांनी अफगाण्यांवर हल्ला केला.

पानिपत मधल्या पराभवामुळे मराठा साम्राज्याच्या विस्ताराला शह मिळाला आणि त्यांच्या साम्राज्याची विभागणी झाली. युद्धानंतर मराठा संघराज्य पुन्हा कधीही एकत्र लढले नाही.

दिल्ली/आग्रा वर ग्वालियरच्या महादजी शिंदे यांचे नियंत्रण होते, इंदोरच्या होळकरांचे मध्य भारतावर नियंत्रण होते, बडोद्याच्या गायकवाडांचे पश्चिम भारतावर नियंत्रण होते.

आजही, मराठीमधील “तुमच्या पानिपतला भेटा” या वाक्याचा अर्थ आणि इंग्रजीतील “भेटला आपला वॉटरलू” चा अर्थ एकच होतो.

१७६१ नंतर, तरुण असलेल्या महादेवराव पेशव्यांनी त्यांची तब्येत नाजूक असताना देखील साम्राज्याच्या पुनर्बांधणीचा प्रयत्न केला.

मोठ्या साम्राज्याचे प्रभाविपणे व्यवस्थापन करण्याच्या प्रयत्नात सर्वात बलवान शूरांना अर्ध-स्वायत्तता देण्यात आली.

त्यामुळेच, बडोद्याच्या गायकवाडांचे स्वायत्त राज्ये, इंदौरचे होळकर आणि [माळवा, ग्वालियरचे सिंधीयाज (किंवा शिंदे) (आणि उज्जैन) उद्गीरचे पवार आणि नागपूरचे भोसले (ज्यांचा शिवाजी किंवा ताराबाई ह्यांच्या परिवाराशी कोणताही संबंध नाही) साम्राज्याच्या दूरच्या प्रांतांमध्ये अस्तित्वात आले.

खुद्द महाराष्ट्रामध्ये देखील अनेक सरदारांना अर्ध-स्वायत्त असलेल्या छोट्या राज्यांचा ताबा देण्यात आला ज्यामुळे सांगली, औंध, मिरज आणि इतर राज्ये अस्तित्वात आली.

१७७५ मध्ये इस्ट इंडिया कंपनी, ज्यांचे तळ मुंबईला होते, उत्तराधिकार संघर्षामध्ये रघुनाथराव (राघोबादादा नावाने देखील ओळखले जात) ह्यांच्या वतीने हस्तक्षेप केला, ज्यामुळे पहिले एंग्लो-मराठा युद्ध ठरले.

१७८२ मध्ये हे युद्ध संपले, आणि युद्धपूर्व परिस्थितीचा जीर्णोद्धार झाला. १८०२ मध्ये, ब्रिटिशांनी बडोद्यामध्ये वारसदाराला विरोधी दावा सांगणाऱ्यांच्या विरुद्ध सिंहासनावर बसवण्यासाठी हस्तक्षेप केला आणि त्यांनी ब्रिटीशांच्या सर्वोच्य स्थानाच्या कबूलीच्या बदल्यात नवीन महाराजांसोबत एका करारावर हस्ताक्षर केले.

दुसऱ्या एंग्लो-मराठा युद्धामध्ये (१८०३-१८०५), पेशवा बाजीराव २ ह्यांनी देखील तश्याच एका करारावर हस्ताक्षर केले.

तिसरे एंग्लो-मराठा युद्ध (१७१७-१७१८) सार्वभौमत्व पुन्हा मिळवण्याचा शेवटचा प्रयत्न ज्याच्या परिणामस्वरूपी मराठा साम्राज्याचे स्वातंत्र्य गमवावे लागले; ज्यामुळे बहुतांश भारतवार ब्रिटेन ची सत्ता होती.

पेशव्यांना बिठूर (कानपूर, उ.प्र.) मध्ये ब्रिटीशांचा निवृत्तीवेतनधारी म्हणून हद्दपार करण्यात आले.

पुण्यासह देशाच्या मराठा मातृभूमीवर ब्रिटीशांची सत्ता स्थापित झाली, केवळ कोल्हापूर आणि सातारा हे जिल्हे स्थानिक मराठा राज्यकर्त्यांकडेच राहिले.

मराठा साम्राज्याची सत्ता असलेली राज्ये ग्वालियर, इंदौर, आणि नागपूर ह्यांनी आपले प्रांत गमावले आणि ब्रिटीश राजवटीबरोबर आपले सर्वोभौमत्व टिकवून ठेवून गौण युती करण्यात आली.

मराठा सरदारांचे इतर छोटे-छोटे राज्य देखील ब्रिटीश राजवटी अंतर्गत राखण्यात आले.

शेवटचे पेशवा, नाना साहेब, ज्यांचा जन्म गोविंद धोंडू पंत म्हणून झाला होता, ते पेशवा बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र होते. १८५७ च्या ब्रिटीश राज्याविरोधातील लढाईमध्ये ते प्रमुख होते.

त्यांनी भारताच्या जनतेला आणि राजकुमारांना ब्रिटीशांविरोधात लढण्यास प्रवृत्त केले. त्यांचे सेनापती तात्या टोपे ह्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि ब्रिटीशांच्या मनात दहशत निर्माण केली.

राणी लक्ष्मीबाई त्यांच्या बालपणीच्या सवंगडी होत्या आणि त्यांच्याशी बंधुतेचे संबंध होते. दोघांनीही ब्रिटीशांच्या विरोधात लढा दिला. त्यांनी भारतीय सैनिकांना ब्रिटीशांच्या विरोधात लढण्यासाठी प्रवृत्त केले.

ह्या स्वतंत्रयुद्धामध्ये जरी त्यांचा पराभव झाला असला तरी भारतीय इतिहासातील एक गौरवशाली देशभक्त म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. तिसऱ्या युद्धामध्ये पराभव त्यांच्या सोनेरी कारकिर्दीवरील काळा डाग ठरला.

मराठा साम्राज्याचा आत्मा आजही भारतीय राज्य महाराष्ट्र “महान राष्ट्र” मध्ये जतन करण्यात आला आहे, जे १९६० मध्ये एक मरठी भाषी राज्य म्हणून स्थापित करण्यात आले.

गुजरात राज्य बनवण्यासाठी बडोदा आणि कच्छ प्रांत एकत्र करण्यात आले. ग्वालियर आणि इंदौर मध्यप्रदेश मध्ये सामील करण्यात आले आणि झांसी उत्तरप्रदेश मध्ये सामील करण्यात आले.

जुन्या दिल्लीत नूतन मराठी शाळा आणि महाराष्ट्र भवनाच्या आजही मराठा सत्तेचे पुरावे दिसून येतील.

साम्राज्याचा वारसा

अनेकदा एक सैल लष्करी संस्था समजला जाणारे मराठा साम्राज्य प्रत्यक्षात क्रांतिकारक प्रवृत्तीचे होते.

सुप्रसिद्ध शिवाजी महाराज ह्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे ह्या साम्राज्याने अनेक मूलभूत बदल घडवून आणले. जे खाली नमूद केलेले आहेत:

साम्राज्याच्या सुरुवातीपासूनच ह्याच्या संस्थापक शिवाजी महाराजांच्या मूलभूत विश्वासांपैकी एक म्हणजे धार्मिक सहिष्णुता आणि धार्मिक बहुलता हे एका राष्ट्र-राज्याचे अत्यंत महत्वाचे आधारस्तंभ मानले गेले आहेत.

मराठा साम्राज्य एकमेव होते जे कधीही जातिवाद मानत नव्हते. इथे ब्राम्हण (पुरोहित वर्ग) क्षत्रिय सम्राटांचे (योद्धा वर्गाचे) (मराठा) पंतप्रधान होते आणि क्षत्रिय धनगर (होळकर) ब्राम्हण पेशव्यांचे विश्वासू सेनापती होते.

साम्राज्याच्या सुरुवातीपासूनच अनेक प्रतिभावान लोकांना नेतृत्वाची भूमिका देण्यात आली ज्यामुळे हे साम्राज्य सामाजिक रित्या सर्वात जास्त सामायिक बनले होते.

हे नोंद करण्यासारखे आहे की इंदौरचा राज्यकर्ता हा एक धनगर, मेंढपाळ होता, ग्वालियर आणि बडोद्याचे कार्यकर्ते शेतकरी होते, भट्ट परिवारातील पेशवा सामान्य घराण्यातील होते; आणि शिवाजींचे सर्वात विश्वासू सचिव हैदर आली कोहारी हे देखील एक सामान्य घराण्यातून होते.

महाराष्ट्रीयन समाजाचे सर्व समूह जसे वैश्य (व्यापारी), भंडारी, ब्राम्हण, कोळी, धनगर, मराठा आणि सरस्वत सर्वांचेच साम्राज्यात चांगले प्रतिनिधित्व होते.

ह्या साम्राज्याचे वैशिष्ठ्य म्हणजे जातिवाद आणि धर्मवाद बाजूला ठेवून प्रत्येक प्रतिभावंताला संधी देणे होय.

मराठ्यांनी सैन्यात मोठ्या प्रमाणात पथके नियंत्रित केली. धार्मिक सहिष्णुतेच्या त्यांच्या धोरणाने हिंदूंच्या हिताला अत्यंत महत्व प्राप्त झाले आणि मुघल प्रभावाच्या विस्ताराच्या विरोधात महत्वपूर्ण दबाव निर्माण झाला.

आजचा विभाजित भारत मोठ्या प्रमाणात मराठा संघराज्याचा भाग आहे.

ह्या साम्राज्याने लक्षणीय असे नौदल देखील तयार केले. त्याहून महत्वाचे म्हणजे ह्याचे नेतृत्व कान्होजी आंग्रे ह्यांनी केले होते.

Subscribe Now For Future Updates!

Join and recieve all future updates for FREE!

Congrats!! Now you are part of HN family!

Pin It on Pinterest