महात्मा गांधींचे जीवनचरित्र- घटनाक्रमांच्या आधारे आढावा

by सप्टेंबर 23, 2020

नमस्कार मित्रहो आज गांधीजींच्या पुण्यस्मरणा दिनी, मी आपणांसमोर महात्मा गांधीजींचे जीवनचरित्र त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना आपल्यासोबत शेअर करणार आहे.

घटकमाहिती
ओळखभारतीय स्वातंत्र्यलढ्यात यांनी शांती आणि सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला. ते भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते तसेच त्यांना लोकांनी भारताचे राष्ट्रपिता म्हणून मान्यता दिली. याशिवाय, ते प्रख्यात राजकारणी, वकील, समाजसेवक, आणि लेखक देखील होते.
नागरिकत्वभारतीय
जन्मदिनांक२ ऑक्टोबर, १८६९
जन्मस्थानपोरबंदर, पोरबंदर जिल्हा
पालकमाता: पुतळाबाई करमचंद गांधी, पिता: करमचंद उत्तमचंद गांधी
पत्नीकस्तुरबा मोहनदास गांधी
मुलेहरीलाल, मणिलाल, रामदास, देवदास
शिक्षणयुनिव्हर्सिटी कॉलेज लंडन कॉलेजमधून एल. एल. बी. चे पदवीधर शिक्षण
व्यवसायवकिली
त्यांचे उल्लेखनीय पुस्तकदि स्टोरी ऑफ माय एक्सप्रीमेंट्स विथ ट्रूथ
पुढील चळवळींमध्ये भाग घेतलाभारतीय स्वातंत्र्य चळवळ
मृत्यु३० जानेवारी, १९४८
मृत्यूस्थाननवी दिल्ली
मृत्युसमयी वय७८
मृत्यूचे कारणनथुराम गोडसे याने बंदुकीच्या गोळी द्वारे हत्या केली.
महात्मा गांधींची स्मारकेराजघाट, गांधी स्मृती, इत्यादी
सहीMohandas Gandhi Signature
Contents hide

प्रस्तावना

ब्रिटिश वसाहतवाद्यांनी जगातील जितक्या राष्ट्रांवर राज्य केले, त्या प्रत्येक राष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्याचा जेव्हा उल्लेख येतो, तेव्हा प्रत्येक देशाच्या संदर्भात कुणा एका व्यक्तीचे नाव डोळ्यासमोर येते. अशावेळी जर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख केला की, आपणासमोर महात्मा गांधींचे नाव डोळ्यासमोर आले तर यात काही नवल नाही.

असं म्हणतात, हक्क हा शांतीच्या मार्गाने मिळत नसतो, तर तो संघर्ष करूनच मिळवावा लागतो. संघर्ष म्हटला की पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो रक्तरंजित हिंसक लढा.

अशा सशस्त्र आंदोलनामुळे हिंसेला प्रेरणा मिळते. त्यामुळे गांधीजींनी आपल्याला सत्याग्रहाचा अहिंसक मार्ग द्वारे संघर्ष कसा करावा हे शिकवले. एवढेच नव्हे तर भारतीय नागरिकांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांना स्वातंत्र्यलढ्यात यशदेखील मिळाले.

Happy Gandhi Jayanti
Image credits: freepik

महात्मा गांधीजींचे कुटुंब

महात्मा गांधींचे माता-पिता

मोहनदास गांधींचे आजोबा उत्तमचंद हे पोरबंदर येथील दिवाण होते. त्यांच्यानंतर करमचंद गांधी यांची दिवाणपदी नेमणूक झाली. पिता उत्तमचंद यांच्याप्रमाणेच करमचंद गांधी देखील मोठे तत्वज्ञ होते.

मोहनदास यांची माता पुतळाबाई धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या नियमाने धार्मिक अनुष्ठान आणि व्रत करत. त्यामुळे नैसर्गिकरित्या मोहनदास गांधींच्या विकासामध्ये पुतळाबाईंनी चारित्र्याचे तर, करमचंद गांधींनी कर्तव्यनिष्ठतेचे बीज रोवले.

आई धार्मिक असल्याने त्यांच्या घरात तुलसीरामायण पाठ नित्य नियमाने होत. लहान असताना ते भूत- प्रेतांना घाबरत, त्यामुळे ते राम नामाचा जप करायला शिकले. त्यांच्या जीवनावरही रामायणाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो.

रघुपती राघव राजाराम | पतित पावन सिताराम ||

– लक्ष्मणाचार्य

वैष्णव राम भक्त लक्ष्मणाचार्य यांनी संस्कृत आदिकवी वाल्मिकी यांच्या ग्रंथातील अध्यायातून १०८ श्री रामाची नावे क्रमबद्ध संकलित केली. त्यांनी लिहिलेले वरील भजन महात्मा गांधी मुळे संपूर्ण भारतभर विख्यात झाले.

मोहनदास सात वर्षांचे होते तेव्हा वडील करमचंद गांधींनी नोकरी सोडून दिली. त्यानंतर संपूर्ण परिवाराबरोबर करमचंद गांधी राजकोट येथे स्थलांतरित झाले.

राजकोटला गेल्यानंतर तेथेही त्यांची दिवाणपदी नियुक्ती झाली. मोहनदास आणि त्यांचे भाऊ करसनदास यांनी प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला.

महात्मा गांधीजींच्या बालपणातील प्रसंग

एक दिवस रंगीबेरंगी चित्रे घेऊन एक व्यक्ती मोहनदास यांच्या घराजवळ आला. त्याच्या हातात असलेल्या अनेक चित्रांपैकी छोट्या मोहनदासचे लक्ष एका चित्राने वेधले.

या चित्रात श्रावण बाळ कावडीमध्ये आपल्या अंध आई-वडिलांना तीर्थ यात्रेसाठी घेऊन चालल्याचे दृश्य होते. श्रावण बाळाचे त्याच्या माता-पिता बद्दल असणाऱ्या विलक्षण प्रेमाचा मोठा प्रभाव मोहनदासवर पडला.

याच प्रमाणे एक दिवस मोहनदासने “सत्यवादी राजा हरिश्चंद्र” हे नाटक पहिले. मोहनदासने नाटकात हरिश्चंद्र अगदी विषम परिस्थितीतही सत्याचे पालन करताना पाहिले. सत्याचे पालन करणे कठीण असले तरी, शेवटी सत्याचे पालन करणाऱ्याचाच विजय होतो, हे त्याला उमगले.

गांधीजींना कदाचित यातूनच विपरीत परिस्थितीत सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली असावी.

मोहनदास गांधी यांचा विवाह

भारतातील समाजात बालविवाहाची परंपरा होती. त्यामुळे त्याकाळी मुला-मुलींचे लग्न अगदी लहान वयातच लावले जाई. त्यामुळे महात्मा गांधींही या परंपरेतून कसे सुटणार?

वयाच्या तेराव्या वर्षी महात्मा गांधींचे त्यांच्या समवयस्क मुलीशी म्हणजेच कस्तुरीबाईंशी लग्न झाले.

मोहनदास गांधींचे शिक्षण

दहा वर्षांचे झाल्यानंतर त्यांनी घराजवळील एका शाळेत प्रवेश घेतला. ते नियमित शाळेत जात आणि शालेय अभ्यासात ते साधारण विद्यार्थी होते. ते अतिशय नम्र स्वभावाचे, चंचल परंतु, अति लाजाळू व्यक्तिमत्वाचे होते.

इसवी सन १८८७ मध्ये मोहनदास गांधी हे अहमदाबाद येथील केंद्रातून मॅट्रीक पास झाले.

पदवीधर शिक्षण करण्याच्या उद्देशाने त्यांनी भावनगर येथील श्यामलदास कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. परंतु पुढे त्यांनी परदेशातून कायद्याचे शिक्षण घेण्याकरता पहिल्याच सत्रात कॉलेज सोडून दिले. त्यासाठी मोहनदास यांचे थोरले बंधू लक्ष्मीदास यांनी पैशाची व्यवस्था केली.

मोहनदास यांची माता पुतळाबाई सुरुवातीस परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याच्या विचारावर एकमत नव्हत्या. परंतु स्त्रियांशी निकट संबंध न ठेवणे, मांसाहार न करणे, आणि व्यसनापासून दुर राहण्याच्या वचनावर पुतळाबाईंनी त्यांना विलायती जाण्यात अनुमती दिली.

महात्मा गांधींनी त्यांच्या माता पुतळाबाईंसमोर घेतलेल्या प्रतिज्ञेमुळे त्यांना परदेशातील बऱ्याच आमिषांपासून दूर राहता आले.

त्यांच्या नात्यातील पारंपरिक विचारांच्या लोकांचा विरोध असतानादेखील इसवी सन ४ सप्टेंबर १८८८ या दिवशी ते विलायतेत जाण्यासाठी निघाले. जवळपास २१ वर्षांचा कालावधी त्यांनी परदेशात घालवला. यादरम्यान त्यांनी अनेक नवीन समस्यांना तोंड देखील दिले.

कायद्याचे शिक्षण घेण्याकरता मोहनदास यांनी ६ नोव्हेंबर १८८८ रोजी इनर टेम्पल मध्ये प्रवेश घेतला. मोहनदास इंग्लंडमधील लंडन शाकाहारी मंडळाचे सदस्य बनले. या मंडळात असताना हिंदू रितींवर आणि आहारावर त्यांनी अनेक लेख लिहिले.

त्या मंडळातील अनेक विद्वानांनी आहाराचे वेगवेगळे प्रयोग केले. ते मदिरा आणि मादक पदार्थांना मानव सभ्यतेवरील कलंक आणि मनुष्य जातीचा सर्वात मोठा शत्रू मानत.

मोहनदास गांधींनी इसवी सन १८८९ च्या शेवटी इडवीन अर्नोल्ड त्यांचा इंग्रजी अनुवाद वाचला. भगवतगीतेतील दुसऱ्या अध्यायामधे श्री कृष्णांनी त्यागाला धर्माचे सर्वश्रेष्ठ रूप सांगितले आहे. या अध्यायाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. हिंदू धर्मातील पवित्र धर्मग्रंथ भगवतगीतेने जगातील अनेक व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव टाकल्याचे आपण ऐकले असेल. महात्मा गांधींच्या जीवनावरही भगवतगीतेमुळे मोठा परिणाम झाल्याचे दिसते.

महात्मा गांधींनी ख्रिश्चन धर्मातील पूजनीय बायबलचेही अध्ययन केले होते. शेवटी महात्मा गांधींनी इसवी सन १० जून १८९१ मध्ये इनर टेम्पल मधून बॅरिस्टरची पदवी घेतली.

पुतळाबाईंचे देहावसान

महात्मा गांधीजींची लंडन मधील ही तीन वर्षांची कारकीर्द महत्वपूर्ण मानले जाते. कॉलेजच्या पदवीधर समारोहानंतर नंतर ८ जुलै १८९१ रोजी ते घरी पोहोचतात, तेव्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. कारण त्यांच्या आई पुतळाबाईंचे देहावसान झालेले असते.

गांधीजींचा आफ्रिकन दौरा

भारतीय कोर्टाचा अनुभव घेऊन वकिलीचा सराव आणि अभ्यास करण्यासाठी मोहनदास मुंबईच्या कोर्टात दाखल झाले. यादरम्यान पोरबंदरच्या व्यापाऱ्यांचा खटला चालवण्यासाठी कराराअंतर्गतते ते दक्षिण आफ्रिकेत गेले. एका महिन्याच्या समुद्रीप्रवासानंतर ते दक्षिण आफ्रिकेतील दरबन या ठिकाणी पोहोचले.

आफ्रिकेत कमालीचा वर्णभेद पाहून गांधीजींचे भान हरपले. वर्णभेदाचे शिकार झालेल्या हिंदी लोकांबद्दल त्यांना दुःख वाटले.

Also read the Early views about Gandhi

आफ्रिकेतील महात्मा गांधींचा झालेला अपमान

रेल्वेप्रवासादरम्यान झालेला अपमान

दरबनमधील कोर्टात दाखल होण्याकरता गांधीजी फर्स्ट क्लासच्या डब्यांमधून प्रवास करीत होते. त्यावेळी तिकीट दाखवूनही टीसीने जबरदस्ती थर्ड क्लास मध्ये जाण्यास सांगितले. त्यांच्यावर होत असलेल्या या अन्यायामुळे गांधीजींनी विरोध केला. त्यावेळी त्यांना धक्के मारून सामानासहित बाहेर काढण्यात येते.

दरबनमधील कोर्टात झालेला अपमान

दरबनमधील खटला चालवण्यासाठी कोर्टामध्ये दाखल झाल्यावर कोर्टात त्यांना पगडी काढण्याचा आदेश दिला. त्यावेळी गांधीजींना हा अपमान सहन झाला नाही. त्यामुळे ते मधेच कोर्ट सोडून निघून गेले.

एका वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेत हिंदू लोकांचा मताधिकार रद्द करण्यासाठी कायदा मंजूर केला. त्यावेळी हिंदी लोकांचे अधिकार मिळवून देण्यासाठी गांधीजींनी आफ्रिकेत रंगभेदविरोधी आंदोलन सुरू केले.

मोहनदास यांच्या आफ्रिकेतील सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी “नताल भारतीय काँग्रेस”ची स्थापना केली. गांधीजींनी आफ्रिकेतील हिंदी लोकांच्या समस्यांचे निवारण करून गोर्‍या लोकांशी संबंध सुधारण्यासाठी या पक्षाची स्थापना केली.

अनेक वर्षे संघटनेचा कारभार सांभाळताना त्यांनी हिंदी लोकांच्या समस्या तत्कालीन नेत्यांपुढे मांडल्या.

महात्मा गांधीजींचे मायदेशी प्रस्थान

महात्मा गांधीजी २६ वर्षांचे असताना इसवी सन ५ जून १८९६ रोजी आफ्रिकेतील स्वातंत्र्यवीरांनीमध्ये सत्याग्रहाचे बीच रुजवून गांधीजी स्वदेशी परतले.

त्यावेळी भारतात आल्यानंतर त्यांच्या समकालीन महान नेत्यांमध्ये न्यायमुर्ती रानडे, सर्फरोज शहा मेहता, लोकमान्य टिळक, गोपाल कृष्ण गोखले, इत्यादी नेते होते.

नतालमधून नोव्हेंबर १८९६ मध्ये महत्त्वाचा संदेश मिळाल्यावर गांधीजींना कस्तुरीबाईंबरोबर भारतातून आफ्रिकेसाठी रवाना व्हावे लागले. त्यामुळे त्यांचे हे भारतातील वास्तव्य अल्पकाळासाठी होते.

आफ्रिकेतील हिंदी जनतेविरोधातील आंदोलन

हिंदी लोकांना आफ्रिकेतून काढून टाकण्यासाठी गोर्‍या लोकांनी आंदोलन छेडले होते. त्यामुळे त्यांना दरबनच्या बंदरापासून बऱ्याच लांब अंतरावर थांबावे लागले.

जहाजामधून दरबनमध्ये उतरताच त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगड-गोट्यांनी मारहाण झाली. त्यांची पगडीदेखील उडवून त्यांना अपमानित केले. परंतु, गांधीजी काहीही प्रतिकार न करता ते सहन करत राहिले. त्यानंतरही याविरोधात त्यांनी कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही.

स्वावलंबन साधे राहणीमान आणि उच्च विचार

यानंतर अल्पकाळातच गोऱ्या युरोपियन लोकांचा हिंदी लोकांविषयीचा द्वेष आता शिगेला पोचला. याचकाळात गांधीजींना स्वावलंबन आणि साध्या राहणीमानाची सवय लागली. त्यांनी सेवाभाव जोपासत एका इस्पितळात काम करायला सुरुवात केली.

कर्मवीर भाऊराव पाटील: शैक्षणिक क्षेत्रात स्वावलंबनाचे दाता

१८९९ मधील डच वसाहत आणि इंग्रज यांच्यातील युद्ध

गांधीजींनी ब्रिटिश साम्राज्यशी प्रामाणिकपणा दाखवत इंग्रजांची मदत केली. घायाळ सैनिकांना सेवा देण्यासाठी त्यांनी युद्धभूमीत जाऊन जखमी सैनिकांना छावणीपर्यंत नेवून त्यांचा इलाज केला. त्यासाठी त्यांनी हिंदी लोकांचा गटदेखील तयार केला.

सुमारे सहा वर्षांचा कालावधी आफ्रिकेत घालवल्यानंतर गांधीजींनी भारतात परतण्याची तयारी केली. भारतात परतताना आफ्रिकेतील त्यांच्या सहकारी लोकांनी मानपत्रसह अनेक मौल्यवान भेटी दिल्या.

अल्पकाळासाठी भारतात प्रस्थान

काँग्रेसच्या अधिवेशनात सहभाग

इसवी सन १९०१ मध्ये भारतात परतल्यानंतर गांधीजींनी पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनात सहभाग घेतला.

महात्मा गांधीजींचे भारत भ्रमण

भारतात परतल्यावर त्यांची अनेक करतो हं स्वातंत्र्यवीरांची त्यांची भेट झाली. भारतीय लोकांची सध्यस्थिती जाणून घेण्याकरता त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. प्रवाशांना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी थर्ड क्लासमधून प्रवास केला.

गांधीजींचा पुन्हा एकदा आफ्रिकेला प्रस्थान

त्यानंतर महात्मा गांधींनी परत स्वतःचा व्यवसाय सुरू केला. परंतु, परत एकदा त्यांना आफ्रिकेतील सहकाऱ्यांचे तार मिळाले. ज्यामुळे त्यांना परत एकदा आफ्रिकेला जावे लागले.

पुन्हा एकदा आफ्रिकेत आल्यानंतर त्यांना कळून चुकले की, त्यांना पुढील लढा आफ्रिकेमध्ये राहूनच द्यावा लागणार. त्यामुळे गांधीजींनी जोहान्सबर्ग येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला.

हिंदुस्थानातील लोकांच्या समस्या समजून त्यांचे निवारण करण्यासाठी त्यांनी स्वतःचे इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक सुरु केले.

सन १९०३ मध्ये महात्मा गांधींनी हेच साप्ताहिक चार भाषांमध्ये सुरू केले. सर्व वर्गातील लोकांचे आकलन केल्यानंतर श्रमिकांचे जीवनच गांधीजींना सार्थक वाटे. त्यामुळे त्यांनी फिनिक्समध्ये बगीचा खरेदी केला.

याठिकाणी त्यांनी वस्ती वसवली आणि श्रमाचे महत्त्व प्रस्थापित केले, ज्यामुळे वस्ती स्वावलंबी बनली. महात्मा गांधीजींनी साध्या राहणीमानाला प्राधान्य दिल्याने, वस्तीतील लोकांनीदेखील त्यांचे आचरण अंमलात आणले. त्यामुळे गरजा कमी झाल्या.

१९०६ मधील झुलू विद्रोह

महात्मा गांधीजींची हिंदी लोकांच्या तुकडी मध्ये सर्जंट मेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली. जिवाची बाजी लावून गांधीजींनी काही मैल डोंगरदऱ्या पार करीत जखमी झुलू लोकांना नेऊन त्यांची सेवा केली. सेवावृत्तीमुळे गांधीजींच्या मनाला शांती मिळे.

गांधीजींद्वारा ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा

शरीर आणि आत्मा यांची साधना एकाच वेळी होऊ शकत नाही. महात्मा गांधींना असा विश्वास होता एक लोकसेवक म्हणून गरिबी बरोबर ब्रह्मचर्याचे पालन महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांनी उर्वरित आयुष्यासाठी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा व्रत घेतला.

या लढाई वरून परतल्या नंतर त्यांना मोठा धक्कादायक समाचार मिळाला. कारण, आशिया वासियांना परवाना काढण्यासाठी भाग पाडणारा सरकारी आदेश जारी केला गेला. या कायद्याला गांधीजींनी मानवते विरोधात केलेला काळा कायदा असे म्हटले.

भारतीय लोकांमध्ये या कायद्यामुळे असंतोष निर्माण झाला. ११ सप्टेंबर १९०६ ला गांधीजींनी प्रतिज्ञा घेतली की, “ मी मृत्यूला प्राप्त झालो तरी चालेल परंतु, आशियायी निवासी विरोधातील या कायद्याला मुळीच मानणार नाही.”

नैतिकतेने पुढील लढा चालू ठेवण्यासाठी गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे शस्त्र अवलंबले. महात्मा गांधी आफ्रिकेतील ब्रिटिश इंडियन असोसिएशनचे मंत्री तसेच वकील होते. परंतु, वकिलाऐवजी राजकारणी कैदी म्हणून गुन्हेगारांच्या पिंजऱ्यात उभे राहण्यात त्यांना सारथ्य वाटे.

महात्मा गांधीजींना कारावासाची शिक्षा

सविनय कायदेभंगामुळे १० जानेवारीला १९१८ ला गांधीजींनी पहिल्यांदा तुरुंगवास भोगला. सत्यवीर सौक्रिटिस पुस्तक वाचल्यावर गांधीजींना वाटले की, सर्व हिंदुस्तानी लोकांनी देखील सौक्रिटिससारखे आचरण अंमलात आणले पाहिजे.

गांधी स्मठ समझौता

पंधरा दिवसानंतर सरकारने काळा कायदा रद्द करण्याच्या आणि सर्व हिंदी लोकांना आपल्या मर्जीने परवाने काढण्याच्या अटीवर सत्याग्रही लोकांना तुरुंगातून मुक्त केले. या करारानुसार गांधीजींनीही परवाना काढण्यासाठी आपल्या बोटाचे ठसे दिले.

परंतु कराराच्या अटीविरुद्ध जात हिंदी लोकांना धोका देत, सरकारने काळा कायदा रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे सर्व परवान्यांच्या कागदपत्रांची होळी करत, काळ्या कायद्याविरोधी आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात झाली.

सर्व आंदोलनकारी एकाच वेळी जेल मध्ये जाण्यास तयार होते. त्यामुळे त्यांना नियंत्रित करणे सरकारपुढे मोठे आव्हान होते. महात्मा गांधीजींमुळे हिंदी लोकांना त्यांच्या आंदोलनांची उद्दिष्टे स्पष्ट होती.

या आंदोलनामुळे गांधीजींना परत दोन महिन्यांचा तुरुंगवास झाला. सर्व स्वातंत्र्यसेनानी अभूतपूर्व साहस दाखवले. २५ जानेवारी १९९० ला गांधीजींना परत कारावास झाला.

महात्मा गांधीजींचा महर्षी टॉलस्टॉय यांच्यावरील प्रभाव

हिंदुस्थानात रुची दाखवणाऱ्यांमध्ये विख्यात लेखक महर्षी टॉलस्टोयही होते. गांधीजींनी त्यांना या सत्याग्रहाची ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी या आंदोलनाशी सहानुभूती दाखवत आशा व्यक्त केली की, हे आंदोलन सफल होऊन जगातील करोडो दलित लोकांकरता एक प्रेरणादायक उदाहरण उभे राहील.

महर्षी टॉलस्टॉय यांनीही महात्मा गांधी आणि त्यांच्या संघर्षाला जाणून घेण्याकरता त्यांचे जीवन चरित्र वाचले. आफ्रिकेत साधे जीवन जगणाऱ्या सत्याग्रही लोकांचे ग्राम वसवण्याचे गांधीजींचे स्वप्न जोहान्सबर्गमध्ये साकार झाले. महात्मा गांधींनी या वस्तीला “टॉलस्टॉय फार्म” असे नाव दिले.

हिंदी लोकांवर लादलेल्या ३ पौंडच्या कराविरोधात आवाज उठवण्यासाठी लोक ऑक्टोबर १९१३ मध्ये ट्रान्सपाल मधील न्यू कासल या शहरातमध्ये जमा झाले. आफ्रिकेतील जनतेचा महात्मा गांधीजींवर खूप विश्वास होता.

महात्मा गांधीजींना न्यू कासल मधून निघालेल्या आंदोलनादरम्यान चार दिवसात तीन वेळेस कारावास झाला. अनेक विघ्नांना सामोरे जात हिंदी लोकांनी हा मोर्चा चालूच ठेवला. ब्रिटिश आफ्रिकन सरकारने गांधीजींवर चार आरोप लावले आणि खटला चालून एक वर्षाचा तुरुंगवास ठोठावला.

गांधीजींचा सत्याग्रहवरील विश्वास आणि प्रयत्नांमुळे त्यांना यश मिळाले. आफ्रिकेत मिळालेल्या यशानंतर गांधीजींना वाटली की, आता त्यांचे आफ्रिकेतील कर्तव्य पूर्ण झाले आहे.

Read how Gandhiji learnt nonvoilence in Africa

गांधीजींची भारतात वापसी

त्यामुळे इसवी सन १८ जुलै १९१४ ला गांधीजींनी आफ्रिकेतून मायदेशी प्रस्थान केले. समुद्रमार्गे प्रवास करत गांधीजी ९ जानेवारी १९१५ ला मुंबईच्या बंदरावर उतरले. त्यावेळी भारतीय तत्कालीन नेत्यांनी आणि लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

महात्मा गांधीजींनी आयुष्याचा मोठा हिस्सा परदेशात घालवला होता. त्यामुळे भारतातील राजकीय वातावरण आणि समस्या त्यांच्यासाठी नव्या होत्या. त्यामुळे गांधीजींनी गोपाल कृष्ण गोखले यांना सार्वजनिक प्रश्नांवर ताबडतोब आपले मत मांडण्यास नकार दिला.

गांधीजी नातेवाईक-मित्रांना भेटण्यासाठी जिथे गेले, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे मोठे स्वागत झाले. त्या स्थानांपैकी शांतिनिकेतनमधील कलेला पोषक असे वातावरण पाहून गांधीजींनी आशा व्यक्त केली की, याच पुरातन संस्कृतीद्वारे भारत पाश्चात्त्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करेल.

यादरम्यान १९ फेब्रुवारी १९१५ च्या दिवशी गोखले यांच्या मृत्यूची खबर कळल्याने गांधीजी दुखी झाले. गोखलेंच्या प्रशंसेमध्ये गांधीजी म्हणाले, “भारतभर भ्रमण केल्यावर त्यांना गोखलेंसारख्या साहसी आत्म्याचे दर्शन झाले.”

सत्याग्रह आश्रमाची स्थापना

त्याग आणि सेवा यांच्या मध्ये झोकून देण्याकरता त्यांनी अहमदाबादमधील कोचरब येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली. त्यांच्या जवळपास पंचवीस अनुयायांनी सत्य, अहिंसा, स्वदेशी खादी, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, आणि अस्पृश्यता निवारणाची प्रतिज्ञा घेतली.

गांधीजींद्वारा चंपारणमधील नीळ श्रापातून मुक्तता

सन १९१७ मध्ये गांधीजी बिहार मध्ये गेले. जिथे त्यांना चंपारण मधील नीळ शेतीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली.

प्रजेच्या फिर्यादीची जेव्हा गांधीजींनी दखल घेतली, तेव्हा सर्व शेतकऱ्यांमध्ये आशेची नवी उमंग पसरली. शेतकऱ्यांनी त्यांची आपबिती सांगितल्यावर, गांधीजींनी शेतकऱ्यांना नीळ शेती बंद करण्यास सांगितले.

चंपारण मधील शंभर वर्षांपासून चालत आलेली निळीची शेती बंद झाली. ही शेती बंद केल्याने सत्याग्रहाची महिमा लोकांना पहिल्यांदा कळाली.

सत्याग्रह आश्रमाचे स्थलांतर

सन १९१७ मध्ये महामारीने भारतात थैमान घातले. कोचरब गावातही महामारी सुरू झाल्यावर गांधीजींनी आश्रमाचे स्थलांतर साबरमती नदीजवळ केले. ज्यामुळे या आश्रमाला सर्व भारतीय “साबरमती आश्रम” या नावाने ओळखतात.

या आश्रमात एक उपासना मंदिर आहे. या मंदिरात रोज संध्याकाळी लोक सर्व धर्म समभावाच्या भावनेने एकत्र येऊन प्रार्थना करीत. साबरमती आश्रमात कामाला ईश्वरभक्तीचा दर्जा होता. आश्रमाचे नियम गांधीजींच्या व्यक्तिमत्वाला दर्शवत.

गांधीजींची तब्येत कच्चा आहार आणि अति श्रम केल्याने ढासळली, त्यामुळे ते मुंबईमध्ये उपचाराकरता आले. महात्मा गांधीजींच्या औषध न घेणे, दूध ग्रहण न करणे यांसारख्या प्रतिज्ञांमुळे त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होत नव्हती. पत्नी कस्तुरबा यांच्या सांगण्यावरून त्यांनी बकरीचे दुध पिण्यास सुरुवात केली.

आजारी असताना देखील त्यांनी सूत कातण्याचे काम शिकले. हाच सूत कातण्याचा चरखा पुढे जाऊन शांतीचे प्रतीक बनला.

१९१९ चा रौलट कायदा

फेब्रुवारी १९१९ ला राष्ट्रीय आंदोलनांची दडपशाही करणारा रौलट कायदा आला. नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करणाऱ्या या कायद्या विरोधात गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन छेडले. विधान सभेतील हिंदुस्थानी सदस्यांच्या विरोध असून देखील १८ मार्च १९१९ ला सरकारने हा काळा कायदा मंजूर केला.

महात्मा गांधीजींनी देशवासीयांना केलेल्या आवाहनानुसार संपूर्ण देशभर सहा एप्रिल १९१९ हा दिवस “सत्याग्रह दिन” म्हणून साजरा केला. सर्व आंदोलकांना जेलमध्ये टाकल्याने देशभरातील कारावासात कमी पडू लागले.

जालियनवाला बाग हत्याकांड

गांधीजींनी केलेल्या आव्‍हानावरुन देशभर सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू होते. सर्व देशवासियांनी गांधीजींच्या म्हणण्यानुसार आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अशा क्रांतीमय वातावरणात शीख बांधवदेखील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आले. अमृतसर शहराच्या बरोबर मध्यभागी असलेल्या जालियनवाला बाग या ठिकाणी शीख समुदायाने सत्याग्रहाचे आंदोलन अहिंसक आणि शांतिमय मार्गाने सुरू केले.

त्यावेळी अमृतसरच्या शहरातून फिरत ब्रिगेडियर जनरल डायरची एक तुकडी तेथे आली. जालियनवाला बाग परिसरात एका छोट्या खिडकीमार्फत त्यांनी आत प्रवेश केला. हजारो आंदोलकांच्या जमावावर कोणताही इशारा न देता जनरल डायरने त्यांच्यावर गोळीबाराचा आदेश दिला. त्यांच्याकडील काडतूसाचा साठा समाप्त होईपर्यंत हा गोळीबार चालूच राहिला.

गावातील हजारो असहाय पुरुष-महिला, लहान मुलांची देखील निर्घृण हत्या करण्यात आली. या गोळीबारात हजारो लोक जखमी झाले तर ३७५ जणांची हत्या झाली.

कायदेभंग आंदोलकांना देण्यात येणारी शिक्षा

कायदेभंग आंदोलनादरम्यान ब्रिटिश सरकारने लोकांना पोट जमिनीला घासत सरपटण्याची तसेच निरपराध लोकांना कवडे मारण्याची शिक्षा दिली. या शिक्षेमुळे गांधीजींच्या मनाला ठेच पोहोचली.

घाबरलेल्या जनतेने हळूहळू हिंसात्मक पाऊल उचलायला सुरुवात केली. सत्याग्रहाचा अर्थ संपूर्ण देशाला कळायच्या आधीच कायदेभंगाचे आंदोलन सुरु करायला नको होते, असे गांधीजींना वाटले. त्यामुळे १८ एप्रिल १९१९ रोजी सत्याग्रहाची चळवळ स्थगित केली.

अमृतसर काँग्रेसने डिसेंबर १९१९ रोजी मोतीलाल नेहरुंच्या न्यायालयात गांधीजींच्या स्वदेशी उत्पन्नामार्फत स्वराज्याचा मंत्र आणि प्राचीन हस्तउद्योगाच्या पुनरुद्धाराच्या प्रस्तावास मंजूर केले.

कारण भारत कृषी-उद्योग संपन्न देश असल्याने भारताची प्रगती नांगर आणि चरख्यावर अवलंबून होती. हळूहळू संपूर्ण हिंदुस्थानात महात्मा गांधींचा जयघोष सुरू झाला.

महात्मा गांधीजींना विश्वास होता की भारताचे नैतिक आणि आर्थिक नवनिर्माण शस्त्रांच्या खणखणाने नाही तर, चरख्याच्या पुनरुद्धारानेच होऊ शकते.

खिलापत आंदोलनात गांधीजींचा सहभाग

ब्रिटनने तुर्कस्तान लादलेल्या अन्यायी अटींविरुद्ध छेडलेल्या खिलापत आंदोलनामध्ये गांधीजीही सामील झाले. या आंदोलनातदेखील गांधीजींच्या अहिंसात्मक असहकार्याचा प्रभावी रीतीने अंमल केला.

लोकमान्य टिळकांचा मृत्यू

या असहयोग आंदोलनाचा प्रारंभ करण्यासाठी गांधीजींनी एक ऑगस्टचा दिवस निवडला. एक ऑगस्टच्याच रात्री लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यू विषयी दुःख व्यक्त करत गांधीजी म्हणाले, “आपण भारताचा नर केसरी कायमचा गमावला. भारताची भविष्यातील पिढी त्यांना आधुनिक भारताचे निर्माता म्हणून आठवतील. स्वराज्याचा मूलमंत्र आणि प्रचार टिळकांनी केला तेवढा कदाचितच भारतातील कोणा दुसऱ्या नेत्यांनी केला असेल. टिळकांच्याचमुळे त्या काळात भारतभर स्वराज्याची भावना पसरली होती”.

नागपुर येथील काँग्रेस अधिवेशन

डिसेंबर १९२० मधील नागपुर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात न्याय्य आणि शांततामय मार्गाने अवघ्या एका वर्षात स्वराज्य मिळवण्याचा गांधीजींचा प्रस्ताव बहुमताने मान्य केला. त्यामुळे काँग्रेसला सर्वसामान्य जनतेच्या ताकतीवर ताबा मिळवण्याकरता संविधानात देखील त्यांच्या विचाराला मान्यता मिळाली.

गांधी युगाचा प्रारंभ

अशा प्रकारे भारतात महात्मा गांधींच्या विचारांना मान्यता मिळत हळूहळू गांधी युगाला सुरुवात झाली. हिंदुस्थानाचा दौरा करत असताना गांधीजींनी अनेक प्रश्‍न विचारात घेतले. त्यापैकी दरिद्रता त्यांच्या समोरील एक मोठी समस्या होती.

स्वराज्याचा झेंडा

महात्मा गांधीजींच्या इच्छेला मान देत चरख्याला स्वराज्याच्या झेंड्यात स्थान मिळाले. स्वराज्याचा तो झेंडा होता तो पवित्रता सर्वधर्म एकतेचा. या झेंड्यात तीन रंग आहेत, पहिला रंग सफेद, दुसरा रंग हिरवा तर, तिसरा लाल या झेंड्याच्या मध्यभागी चरखा आहे.

सन १९२१ मध्ये जन्मास आलेला हा राष्ट्रध्वज अहिंसात्मक क्रांती आणि आदर्श जीवनासाठीचा प्रतीक होता. गांधीजींनी मुंबईत विदेशी कपड्यांचा बहिष्कार करण्यासाठी ३१ जुलै १९२१ मध्ये परदेशी कपड्यांची होळी करून निषेध केला. या निषेधाला संपूर्ण देशभर पाठिंबा मिळाला.

महात्मा गांधीजींद्वारा कपड्यांचा त्याग

देशभ्रमण करताना ते मुंबईत आले तेव्हा त्यांना असे कळले की, देशभरातील करोडो गरीब लोक परदेशी कपड्यांची होळी केल्यानंतर नवीन स्वदेशी कपडे लगेच विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे गांधीजींनी स्वतः टोपी पगडी आणि कुर्त्याचा त्याग करण्याची प्रतिज्ञा केली. त्यासाठी त्यांनी २१ सप्टेंबरला सकाळी मुंडन केले आणि उर्वरित आयुष्य एकाच अंगवस्त्रात घालवण्याची प्रतिज्ञा केली.

अहमदाबाद मधील काँग्रेस अधिवेशनादरम्यान क्रांतीचे वातावरण शिगेला पोहोचले. काँग्रेसमधील सर्व नेत्यांनी सशस्त्र आंदोलनाऐवजी अहिंसक असहकार चळवळीला प्राधान्य दिले. काँग्रेस पक्षाने देखील गांधीजींना सर्व विशेषाधिकार दिले.

गांधीजींद्वारे सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाला स्थागिती

व्हाइसरॉय यांना पत्रात गांधीजी म्हणाले की, गुजरात मधील बारडोली तालुका अहिंसात्मक लोकक्रांतीचा पहिला मोर्चा असेल. परंतु, या आधीच ५ फेब्रुवारी १९२२ या दिवशी चौराचौरी या गोरखपुर जिल्ह्यातील एका गावात ब्रिटन पोलिसांविरोधात झालेल्या हिंसेमुळे बार्डोलीत होणाऱ्या सविनय कायदेभंगाचे आंदोलन स्थगित केले.

महात्मा गांधीजींना राजद्रोही लेख लिहिण्याच्या आरोपावरून अटक

त्यानंतर यंग इंडियन मध्ये राजद्रोही लेख लिहिण्याच्या आरोपावरून १० मार्च १९२२ च्या दिवशी गांधीजींना अटक झाली. १८ मार्च ला अहमदाबाद येथील सर्किट हाऊस मध्ये खटला सुरू झाला. त्यावेळी त्यांच्यावर तीन राजद्रोही लेख लिहिण्याचा आरोप होता.

पहिल्या दोन लेखात त्यांनी ब्रिटन सरकारबरोबर बेईमानी करण्याचा तर तिसर्‍या लेखात दलितांचे शोषण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आव्हान केले होते.

तिसऱ्या लेखात त्यांनी म्हटले होते की, “जोपर्यंत ब्रिटिश सरकारचा शिकारी पंजा आपल्या छातीवर आहे, करार कसा होऊ शकतो.”

गांधीजींनी स्वतःला शेतकरी, कामकरी म्हणून अपराध मान्य केला. त्यांच्या बचावात ते म्हणाले, “ज्या ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानाला दास बनवून खिळखिळे केले आहे. अशा सरकारविरुद्ध बेईमान होणे मी माझा धर्म समजतो. याकरता मला कोणतीही कठोर शिक्षा मंजूर आहे.

या खटल्याचा निर्णय सुनावला आणि गांधीजींना सहा वर्षांचा कारावास झाला. त्यांना जेलमध्ये कुठेही माणुसकी दिसली नाही. गांधीजींना इतर कैद्यांपासून दूर एकांतवासात ठेवले गेले.

तुरुंगातील प्रत्येक नियम त्यांच्यावर सक्तीने लादले जात. कोठडीतून बाहेर काढल्यानंतर पूर्ण तपासणीनंतरच त्यांना परत तुरुंगात बंद केले जाई. सुरुवातीच्या बावीस महिन्यानंतर गांधीजींच्या तब्येतीवर खूप परिणाम झाला.

याच दरम्यान त्यांच्यावर १२ जानेवारी १९२४ च्या रात्री पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू होती. शस्त्रक्रियेदरम्यान अचानक विद्युत प्रवाह खंडित झाल्याने सर्व लाईट्स बंद होतात. त्यावेळी डॉक्टर केवळ कंदिलाच्या प्रकाशात गांधीजींची शस्त्रक्रिया पूर्ण करतात.

सरकारकडून गांधीजींची शिक्षा माफ

सन ४ फेब्रुवारी १९२४ या दिवशी ब्रिटिश सरकार गांधीजींची बाकी शिक्षा रद्द करून त्यांना मुक्त करते. काँग्रेसचे ३९ वे अधिवेशन २६ डिसेंबर १९२४ ला बेलगाम मध्ये पार पडले. या अधिवेशनात ते काँग्रेस पक्षाला उद्देशून म्हणाले की, “चार आण्याच्या सदस्यांऐवजी हाताने सूत कातणाऱ्या व्यक्तीलाच मताधिकार द्यावा.”

सत्याग्रहाचा अर्थ

या अधिवेशनात गांधीजींनी सत्याग्रहाचा अर्थ लोकांना सांगितला. गांधीजींनी सत्याच्या शोधला सत्याग्रह असे म्हटले आहे. स्वराज्य आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, तसेच सत्याग्रह सुद्धा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे.

अस्पृश्यतेला घोर अपमान मानणारे गांधीजी म्हणतात की, “अस्पृश्य तो आहे जो राष्ट्र हिताच्या विरोधात असेल मनुष्य अस्पृश्य नाही.”

अधिवेशनानंतर गांधीजींची कॉंग्रेसची अध्यक्षता पूर्ण झाली. त्यानंतर गांधीजींनी राजकीय क्षेत्रात मौन पाळून क्षेत्र संन्यास धारण करण्याची प्रतिज्ञा घेतली. महात्मा गांधींच्या मते, मौन आराधनेचा एक प्रकार असून मौन केल्याने ध्यान एकवटून कामातील एकाग्रता वाढते.

यामुळे गांधीजींना शारीरिक आराम मिळाल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित बार्डोली येथील शेतकऱ्यांनी करवाढी विरोधात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात कायदेभंगाचे आंदोलन केले.

बारडोली सत्याग्रह
Image credits: Wikimedia

सायमन कमिशनविरोधी आंदोलन

राष्ट्रीयतेच्या भावनेने प्रेरित होऊन देशातील विविध भागातील नागरिकांनी सायमन कमिशन विरोधात आवाज उठवला.

याच दरम्यान पंजाब मध्ये सायमन विरोधी एका अहिंसक मोर्चामध्ये नेता लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्जचा आदेश दिल्याने ते जबर जखमी झाले. यातच काही दिवसानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गांधीजींनी त्यांना श्रद्धांजली देताना म्हटले की, “जोपर्यंत सूर्य चंद्र चमकतील तोपर्यंत लालाजींसारखे नेता अमर राहतील.”

कलकत्ता काँग्रेस अधिवेशन

डिसेंबर १९२४ मध्ये, कलकत्त्यातील काँग्रेस अधिवेशन मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

तरुणांमधील प्रसिद्ध नेते पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाष चंद्र बोस यांनी संस्थानिक स्वराज्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वपक्षीय अहवालांचा विरोध केला.

गांधीजींनी करारनामा जाहीर करत संस्थानिक स्वराज्य देण्यासाठी ब्रिटिश सरकारला एक वर्षाची मुदत दिली. त्याचबरोबर गांधीजींनी ब्रिटिश सरकारला चेतावणी देखील दिली की, “सर्व मागण्या ३१ डिसेंबरच्या आत पूर्ण व्हाव्यात अन्यथा काँग्रेस समोर संपूर्ण स्वराज्याचे ध्येय उभे राहिल.”

त्यानंतर राजकीय वातावरण अस्थिर झाले याच काळात भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी विधानसभेत बॉम्ब हल्ला केला. या हल्ल्याचा उद्देश ब्रिटिश सरकारला जागे करून त्यांच्या पर्यंत पीडित जनतेचा आवाज पोहोचवणे हा होता.

गांधीजींनी ब्रिटन सरकारपुढे ठेवलेली एक वर्षाची मुदत संपत आली लाहोरच्या सीमेवरील रावे च्या किनारी काँग्रेसचे ४५ वे अधिवेशन झाले त्यावेळी मोतीलाल नेहरूंनी काँग्रेस पक्षाची जबाबदारी जवाहरलाल नेहरूंकडे सोपवली. जवाहरलाल यांनीदेखील समाजवाद आणि जनतंतत्रामध्ये आपली रुची व्यक्त केली.

शेवटी गांधीजींच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि ३१ डिसेंबर च्या रात्री बारा वाजता ब्रिटिश सरकारने नवीन वर्षाची सुरुवात होताच पूर्ण स्वराज्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. हिंदुस्थानाचा जयघोष आणि इन्कलाब जिंदाबाद घोषणा देत आघाडीचा झेंडा फडकवला गेला हिंदुस्थानाच्या आजादी चा डंका जगभरात वाजायला लागला.

देशभर २६ जानेवारी १९३० या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करीत आंदोलनाची तयारी सुरू झाली. लोकांमधील राष्ट्रवादाची भावना आणि उत्साह पाहून गांधीजींचा आंदोलन पुन्हा सुरू करण्यासाठी लागणारा विश्वास वाढला.

गांधीजींनी अकरा मुद्यांचे एक घोषणापत्र तयार केले यामध्ये दारूबंदी जमीन महसूल सैनिक खर्च कमी करणे मिठावरील कर रद्द करणे यांसारखी महत्त्वाचे मुद्दे होते.

त्यांनी लिहिले की पाणी हवा अन्न मीठ मनुष्याच्या आरोग्य करतात सर्वात गरजेची वस्तू आहे. लिहिले की, “जर, मी लिहिलेल्या पत्राचा तुमच्या मनावर कोणताच परिणाम झाला नाही तर याच महिन्याच्या अकरा तारखेला मी सरकारी मिठाच्या कायद्याचा आदर करेन”.

व्हॉईसरॉय नकारात्मक उत्तर मिळाल्यावर गांधीजी आत्ताच झाले गांधीजींनी विचार करून निर्णय घेतला की ते स्वतः समुद्र काठावर जाऊन मी उचलून सविनय कायदेभंगाची सुरुवात करतील.

या ऐतिहासिक क्षेत्री पूर्वी झालेल्या भाषणात ते म्हणाले साबरमतीच्या किनाऱ्याची कदाचित हे माझे शेवटचे भाषण असू शकते या शांतीमय आणि अहिंसात्मक संग्रामात आपण सर्वांनी आपल्याकडे उपलब्ध प्रत्येक साधनांचा उपयोग करण्याचा निर्धार केला आहे. गांधीजींनी या आंदोलनात महिलांनादेखील सामील होण्यासाठी प्रेरित केले.

सत्याग्रहाच्या ताकतीने पुढे या कायदेभंगानंतरही आंदोलन सुरू राहण्यासाठी गांधीजी म्हणाले, “मी हा कायदा तोडल्यानंतर देशभरातील जितके ठिकाणी शक्य असेल तेथे बेकायदेशीररीत्या मीट बनवून तसेच खरेदी आणि विक्री करून सविनय कायदेभंग चालू ठेवा.”

१२ मार्च १९३० चा दिवस उजाडला गांधीजींच्या प्रेरणेने हजारो लोकांचा जनसमूह आश्रमाजवळ जमा झाला. गांधीजीने साबरमती आश्रम सोडला आणि समुद्रकिनारी वसलेल्या दांडी या गावासाठी प्रस्थान केले.

Dandi March of Mahatma Gandhi
Image credits: Yann

त्यांच्यासोबत शेकडो स्त्री-पुरुषांचा जनसमुदाय बरोबर निघाला. सर्वांचे अंतिम लक्ष होते ते 241 किलोमीटर दूरवर वसलेले दांडी हे गाव. महात्मा गांधीं बरोबर सर्व यात्रेकरू रोज सुमारे दहा मिळेल अंतर कापत. रस्त्यात येणार्‍या प्रत्येक गावात त्यांचे स्वागत होईल. गांधीजीही त्या गावांमध्ये दारू सोडणे, बालविवाह आणि इतर वाईट प्रथा बंद करणे या विषयांवर प्रबोधन करीत. तसेच इशारा मिळताच मिठाचा फायदा तोडण्या करता प्रेरीतही करीत.

जशीजशी गांधीजींची दांडी यात्रा समुद्रतटा कडे सरकत होती तसतसा देशातील जनतेचा उत्साह वाढत होता. साबरमती ते दांडी हा लांबचा प्रवास पूर्ण करण्यासाठी गांधीजींना चोवीस दिवसांचा कालावधी लागला शेवटी 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी आणि सर्व सत्याग्रहींचे सरोजनी नायडूंकडून दांडी या गावात स्वागत झाले.

गावात प्रवेश केल्यानंतर सर्व सत्याग्रहींना तयार करण्यासाठी गांधीजींनी सभा बोलावली सभेत गांधीजी सर्व गोष्टी स्पष्ट करत म्हणाले, “ जे ब्रिटिश सरकारला घाबरतात त्यांनी निघून जावे आणि जे लोक छातीवर गोळ्या खाण्यास किंवा जेल मध्ये जाण्यास तयार असतील, फक्त त्यांनीच उद्या सकाळी माझ्याबरोबर यावे.”

सकाळी समुद्रस्नान करून गांधीजींनी मिठागरातील मूठभर मीठ हातामध्ये घेऊन काळा कायदा तोडला. कायदेभंगाचा इशारा मिळताच देशभर ठीक-ठिकाणी आंदोलन सुरू झाले. त्यामुळे अनेक सत्याग्रहींना यांचा आणि अत्याचाराला सामोरे जावे लागले अनेक जणांना अटक झाली किती जणांवर खटले चालवले अनेक जणांकडून मीठ हिसकावून जबर मारहाण करण्यात आली. तरीदेखील सर्व सत्याग्रहींनी शांत राहून सर्व काही सहन केले.

व्हॉईसरॉयला इशारा

गांधीजींनी दांडी जवळील कराडी गावातील आंब्याच्या बागेत काही काळ वास्तव्य केले. यादरम्यान त्यांनी एका मीठ आजारावर अहिंसक रित्या कायदे भंग करण्याचा एका पत्राद्वारे व्हॉईसरॉयला इशारा दिला.

या पत्रात गांधीजी म्हणतात, “ जर मी ब्रिटिश शासनाला आपला धारदार पंजाब पूर्णपणे वापरून सत्याग्रहींना जास्तीत जास्त संकटाला सामोरे जायला संधी दिली नाही तर हा माझा भ्याडपणा असेल.”

ब्रिटिश सरकारद्वारे गांधीजींना पुन्हा एकदा अटक

चार में १९३० रोजी रात्री सशस्त्र ब्रिटीश फौजेची एक तुकडी गांधीजींच्या झोपडीत दाखल झाली. त्यावेळी पण १८२७ च्या धारा २५ नुसार महात्मा गांधीजींना इंग्रज सरकारने अटक केली.

कारावासात जाण्याआधी गांधीजींनी देशभरातील सत्याग्रहींचा स्वाभिमान जागा करत म्हणाले, “हिंदुस्तानचा स्वाभिमान सत्याग्रहींच्या मुठीतील मीठातच सामावलेला आहे. त्यामुळे मुठी जरी कुचलून टाकल्या तरी स्वेच्छेने मीठ सरकारकडे सोपवू नका.

महात्मा गांधीजी पुढे म्हणाले की लोक माझी इच्छा आहे की सर्व लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान करून जीवन जगायला शिकावे राजगादी गांधीजींवर कोणत्याही पटल्याशिवाय पुण्याच्या येरवडा जेलमध्ये टाकले.

हुकुमशहा ब्रिटिश राजवटीत अशी परिस्थिती होती हिंदुस्थानची. गांधीजींच्या आंदोलनाला कुचलण्याकरिता ब्रिटिश सरकार अजून अन्यायी आणि निर्दयी बनण्याचा प्रयत्न करत होते.

विदेशी कपडे आणि दारूवरील बहिष्कार

गांधीजींच्या म्हणण्यानुसार सर्व सत्याग्रहींनी देशभरातील दारूच्या अड्ड्यांवर पहरे लावण्यात आले. त्यामुळे देश वासी तरुणांमधील व्यसनाचे प्रमाण कमी झाले.

विदेशी कपडे वापरण्याची सोडून अनेक हिंदुस्थानी देशवासीयांनी स्वदेशीचा स्वीकार केला. शेतकऱ्यांनीही लाजा न देण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रीय पातळीवर त्यांचे चांगले परिणाम दिसू लागली.

कारण अशा घटनेमुळे राष्ट्राच्या ताकतीवर लोकांचा विश्वास वाढला. देशातील लोक आता उठाव करण्यासाठी उत्सुक होते विधानसभेतीलही अनेक सदस्यांनी राजीनामा दिला. ब्रिटिश सरकारने अनेक काँग्रेसच्या समित्या गैरकायदेशीर असल्याचे घोषित केले. सामूहिक अटक केल्याने तुरुंग कमी पडू लागले.

एक काँग्रेस नेत्यांना कारावासात टाकले. परंतु आंदोलन थांबले नाही कारण आंदोलनाचे नेतृत्व इतर नेत्यांनीही कुशलतेने सांभाळले. खूप प्रयत्न करून देखील सरकार परिस्थिती नियंत्रित करू शकत नव्हते हजारो हिंदुस्तानी या आंदोलनात शहीद झालेले हे आंदोलन काही महिने चालले.

शेवटी व्हाइसरॉयच्या अनुमतीने तेज बहादुर सपरु आणि मुकुंदराव जयकर संधीसाठी गांधीजींना भेटण्यासाठी येरवडा जेल मध्ये केले गांधीजी म्हणाले पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने त्यांचा निर्णय अंतिम असेल गांधीजींनी असे म्हटल्यावर जवाहरलाल आणि पिता मोहन मोतीलाल नेहरू यांना चर्चा करण्यासाठी नयनी जेलमधून येरवडा जेलमध्ये हलवण्यात आले.

सन २६ जानेवारी १९३१ या दिवशी कोणत्याही अटी शिवाय गांधीजींना मुक्त केले गेले त्यानंतर ते कराड करण्यासाठी इच्छुक असताना अहमदाबाद येथे जावे लागले कारण मोतीलाल नेहरू यांची प्रकृती अचानक खालावली होती यातच मोतीलाल नेहरू यांचा सहा फेब्रुवारी १९३१ रोजी देहांत झाला.

Featured image by Harryarts: www.freepik.com

Subscribe Now For Future Updates!

Join and recieve all future updates for FREE!

Congrats!! Now you are part of HN family!

Pin It on Pinterest