प्रस्थावना
पृथ्वीराज चौहान हे बाराव्या शतकातील चहमान (चौहान) घराण्यातील सर्वात पराक्रमी राजा होते. भारत देशामधील उत्तर-पश्चिम क्षेत्रात चौहान घराण्याचे अधिपत्य होते. ऐतिहासिक लोककथांमध्ये पृथ्वीराज चौहान हे “राय पिथौरा” नावाने प्रसिद्ध आहेत. पृथ्वीराज चौहन यांनी सध्याच्या राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेशचा काही भाग,हरियाणा तसेच दिल्ली या विस्तीर्ण प्रदेशावर राज्य केले.
मुहम्मद गझनीद्वारे भारतीय धार्मिक स्थळांची लूट
पृथ्वीराज चौहानने काही काळासाठी राजधानी अजमेरू (अजमेर), तर त्यानंतर दिल्ली येथून राज्यकारभार पहिला.
“भारत” ज्याला इतिहासात “सोने की चिडिया” या नावाने संबोधले जात होते. इसवी सणाच्या अकराव्या शतकाच्या सुरवातीला अनेक मुस्लिम आक्रमणे झाली. त्यात, मुहम्मद गझनीने अनेक स्वाऱ्या केल्या आणि प्रचंड प्रमाणात सोमनाथ, मथुरा, वृंदावन येथील मंदिरे, धार्मिक स्थळे लुटली. गझनीचा सुलतान मुहम्मद याचा या स्वाऱ्यांमागे राज्य करणे हा उद्देश नव्हता. त्यामुळे, ही सर्व लुटलेली संपत्ती घेऊन तो परत जायचा आणि पुन्हा स्वारी करायचा.
परंतु, गजनीच्या स्वाऱ्यांनंतर मात्र मुहम्मद घोरीने बाराव्या शतकात भारतावर पुन्हा आक्रमण केले. गजनीप्रमाणे मुहम्मद घुरीनेही मोठ्या प्रमाणावर संपन्न मंदिरे लुटली. मुहम्मद घुरीला मात्र सत्ता प्रिय होती, त्याला दिल्लीचे तख्त मिळवायचे होते.

महत्वाकांक्षी मुहंमद घोरी
मुहंमद घोरीने दिल्ली काबीज करण्याच्या महत्त्वाकांक्षेने भारतावर आक्रमण केले. त्यावेळी, दिल्लीच्या सिंव्हासनावर पृथ्वीराज चौहान विराजमान होते.
पृथ्वीराज चौहान हे खूप धाडसी आणि पराक्रमी होते. त्यांनी मुहम्मद घुरीला 2 वेळा युद्धामध्ये हरवून दिल्लीची आणि भारतभूमीची परकीय आक्रमणांपासून रक्षा केली. पृथ्वीराज चौहान यांनी चंदेल राजा परामरदी, गुजरातचा राजा भीमदेव अशा अनेक हिंदू राजांचा पराभव केला होता.
मुहम्मद घोरीचे स्वप्न
त्याकाळी भारतासारखा समृद्ध आणि उपजाऊ देश जगात दुसरा कदाचितच असेल. त्यामळे, घोर येथील घुरीद घराण्यातील मुह्हम्मद घुरी याचे भारतावर राज्य करण्याचे स्वप्न होते. त्याची ही मनषा पूर्ण करण्यासाठी इतक्या वेळेस पराभूत होऊनदेखील, त्याला पुन्हा आक्रमण करण्याची इच्छा होत असे.
तारेनचे दुसरे युद्ध
तारेनला झालेल्या या लढाईमध्ये भयानक रक्तपात झाला होता. पृथ्वीराज चौहानच्या बाजूने ३ लाखाची सेना होती आणि मुहम्मद घोरीकडे १ लाखाची सेना होती.
पृथ्वीराज चौहानला तारेनच्या दुसऱ्या युद्धात हरवणे एवढे सोपे नव्हते, याची मुहम्मद घोरीला जाणीव होती. त्यामुळे, त्याने सरळमार्गाने हरवणे कठीण म्हणून छळ-कपट करून, काहीही करून जिंकण्याचा निर्धार केला होता.
राजा जयचंद याची घोरीशी हातमिळवणी
तारेनच्या दुसऱ्या लढाईमध्ये मात्र मुहम्मद घोरीला कनौजच्या जयचंदचा साथ मिळाला. पृथ्वीराज चौहान जयचंदच्या मर्जीविरुद्ध त्याची मुलगी संयोगिता हीला महालातून पळवून तिच्याशी विवाह केला होता. त्यामुळे जयचंद पृथ्वीराजवर प्रचंड नाराज होता. या अपमानाचा बदल घेण्याकरिता, जयचंद परकीय आक्रमणकारी मुहम्मद घोरीशी हातमिळवणी करतो.
घोरीची कपटनिती
पृथ्वीराज चौहानच्या योजनेची माहिती मिळवण्याकरिता मुहम्मद घोरीने जयचंदचा उपयोग करून घेतला.
मुहम्मद घोरी युद्ध सुरु होण्यापूर्वीच युद्ध बंद करण्याचा आदेश देतो. राजपूत सूर्यवंशी रात्रीचे हत्यार उचलत नाहीत याची माहिती जयचंदने घोरीला दिली होती. त्यातच शत्रूने युद्ध सुरु होण्यापूर्वीच माघार घेतली याचा आनंद पृथ्वीराजच्या सेनेमध्ये होता.
हजारो राजपूत सैनिकांची कत्तल
यादरम्यान पृथ्वीराजची पत्नी संयोगिता गरोदर असल्याची बातमी कळते. त्यामुळे सर्व सेनेमध्ये जल्लोषाचे वातावरण असते. काही ब्लॉग्समध्ये तर सर्व सेनेने मदिरा पिल्याचा उल्लेख आहे. असो, त्याचा फायदा घेऊन मुहम्मद घोरी रात्रीचे आक्रमण आक्रमण करतो. तंबूमध्ये झोपलेल्या अवस्थेतच हजारो राजपूत सैनिकांची कत्तल होते.
काही ब्लॉग मध्ये उल्लेख आहे की, या युद्धादरम्यान तुर्कांची तिरंदाजीची मारकक्षमता जास्त होती. जर असे होते तर, तारेनच्या पहिल्या युद्धामध्ये तुर्कांची मारकक्षमता कुठे गेली होती? भारतीय इतिहासाला बदलून, भारतीयांना बदनाम करण्याची संधी कुणी सोडायला तयार होत नाही.
अशा रीतीने अधर्मी कृत्य करून मुहम्मद घोरी युद्धामध्ये विजयी होतो. असो, शत्रूच्या प्रत्येक चालीवर नजर ठेवणे जे गरजेचे होते, ते त्यावेळी गुप्तचर यंत्रणेने चोखपणे केले नसावे. कारण, शत्रू अधर्मी असो कि धर्मपरायण, युद्धाचा परिणाम संपूर्ण राज्याला चुकवावा लागत असतो.
त्यानंतर, पृथ्वीराज चौहानला बंदी करून अफगाणिस्तानमधील घोर नेले जाते. बंदी केल्यानंतर पृथ्वीराज चौहानचे डोळे फोडून आंधळे करण्यात येते.
चंद बरदाई आणि पृथ्वीराज रावसो
त्यानंतर काही महिन्यांनी पृथ्वीराज चौहानच्या दरबारात असणारा कवी “चंद बरदाई” हा “पृथ्वीराज रावसो” हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी अफगाणिस्तानमधील घोरला येथे जातो. मुहम्मद घोरीसमोर पृथ्वीराजला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. मुहम्मद घोरी त्यावेळी युद्ध जिंकण्याच्या खुशीमध्ये त्याला परवानगी देतो.
चंद बरदाई आपल्या सम्राटची दयनीय अवस्था पाहून त्याचा बदला घेण्यासाठी योजना बनवतो. ती पूर्ण योजना पृथ्वीराजला सांगतो.
पृथ्वीराजचा शब्दभेदी बाण
त्या योजनेनुसार तो मुहम्मद घोरीसमोर पृथ्वीराज चौहानच्या धनुर्विदेची प्रशंसा करतो. त्यामध्ये मुहम्मद घोरीला सांगतो, “पृथ्वीराज चौहान शब्दभेदी बाण चालण्यात माहीर आहेत.” पृथ्वीराज चौहानची इतकी प्रसंशा केल्याने मुहम्मद घोरीला शब्दभेदी बाण चालवण्याची कला पाहण्याची इच्छा होते.
कवी चंद बरदाई खूप बुद्धिमान कवी होते, ते प्रत्येक वाक्याची कविता करण्यात पटाईत होते. त्यांनी केलेली कविता पृथ्वीराज चौहानला सहजपणे समजत असे.
मुहम्मद घोरी सैनिकांना आदेश देऊन पृथ्वीराजला दरबारात बोलावून त्यांच्या बेड्या खोलण्यास सांगतो. कवींच्या सांगण्यानुसार त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण देतात.
मुहम्मद घोरी हा चलाख होता त्याला माहित होते, की याचा फायदा पृथ्वीराज चौहान घेऊ शकतो. त्यामुळे, तो स्वतः एका उंच सिंहासनावर बसतो. त्यावेळी चंद बरदाई मुहम्मद घोरीची बसण्याची जागा पृथ्वीराज चौहानला कवितेच्या रूपात सांगतो.
ती कविता अशी,
चार बांस चौबीस गज, अंगुल अष्ट प्रमाण, ता ऊपर सुल्तान है मत चुके चौहान।
– चंद बरदाई
ही कविता ऐकल्यानंतर दुसऱ्या क्षणी, सुलतान मुहम्मद घोरीचा कंठ बाणाने भेदला जातो. सुलतान मारला गेला हे पाहिल्यावर दरबारात हाहाकार माजतो. सैनिक दोघांना पकडणार तोच चंद बरदाई योजनेप्रमाणे पृथ्वीराज चौहानला आणि स्वतःला कट्यार मारून प्राण सोडतात.

अशा प्रकारे, कवी चंद बरदाईच्या चतुराई आणि बलिदानामुळे पृथ्वीराज चौहान यांना त्यांच्या यातनांपासून मुक्ती मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे, सुलतान मुहम्मद घोरीला युद्ध जिंकल्याचा आनंद काही घेता येत नाही.
पृथ्वीराज चौहान आणि पत्नी संयोगिता (संयुक्ता)
पृथ्वीराज रासो ग्रंथाप्रमाणे, पृथ्वीराज चौहान जयचंदचे मावस भाऊ होते. तसेच, पृथ्वीराज चौहान आणि संयोगिता यांचे एकमेकांवर प्रेम होते. पृथ्वीराज विजय या ग्रंथामधेही या प्रेमकथेला काहीश्या प्रमाणात पाठिंबा मिळतो. एवढे मात्र नक्की की पृथ्वीराज चौहान आणि कनौजमध्ये राजकीय वाद सुरु होते.
पृथ्वीराज रासो प्रमाणे, पृथ्वीराज चौहानने संयोगिताला पळवून तिच्याशी लग्न केले होते. परंतु, पृथ्वीराजच्या समकालीन असणारे महाकाव्य पृथ्वीराज विजय या गोष्टीला पाठिंबा देत नाही.
पृथ्वीराज रासो मध्ये वर्णिलेली पृथ्वीराज चौहान आणि संयोगिता यांची मध्ययुगीन इतिहासातील प्रेमकहाणी आजही प्रसिद्ध आहे.
पृथ्वीराज रासोची सर्वात जुने पुस्तक हे १६व्या शतकातील आहे. त्यामुळे, त्या ग्रंथाला काही इतिहासतज्ज्ञ ऐतिहासिकदृष्ट्या जास्त महत्वाचे मानत नाहीत. तर काही इतिहासतज्ज्ञ त्याला ऐतिहासिक स्रोत म्हणून मानतात.
वैशिष्ट्यीकृत छायाचित्र: अजमेर असोसिएशन